लोकसत्ता टीम

नागपूर : ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हांवर लढवली जात नाही. त्यामुळे त्या निवडणुकांचा निकाल आपल्याच बाजूने लागल्याचा दावा करून छाती फुगवण्यापेक्षा हिम्मत असेलतर पराभवाच्या भीतीपोटी थांबवून ठेवण्यात आलेल्या महापालिका, नगरपरिषद निवडणुका तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका घेऊन दाखवा, असे आवाहन माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपला दिले.

Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Local Government Election Preparations BJP busy in front building but Congress is sluggish
भाजप मोर्चेबांधणीत व्यस्त, काँग्रेस सुस्तच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारी
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”
guardianship of Akola district is with Adakash Fundkar print politics news
अकोल्याला सलग चौथ्यांदा बाहेरची पालकमंत्री; समन्वय राखून प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागताच मुंबईपासून गल्लीपर्यत भाजपाची नेतेमंडळी जल्लोष साजरा करीत आहेत. राज्यात मोठा पक्ष म्हणून दावा करीत आहेत. परंतु कोणत्या ग्रामपंचायतमध्ये त्यांची सत्ता आली याची यादी मात्र देत नाही. काही प्रतिज्ञा पत्र दाखवून ते प्रसार माध्यमांनसमोर येतात आणि चुकीची आकडेवारी सांगण्यावर त्यांचा भर आहे. इकीच पोटतिडकी जर त्यांनी राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महागाई, आरक्षणाच्या प्रश्नावर दाखविली असती तर राज्यातील सर्व सामान्य जनतेला याचा फायदा झाला असता. परंतु याकडे लक्ष देण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना का वेळ नाही ? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा-अमरावती: बालिकेवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली नाही. केंद्र सरकारने शेतीमालाचा जी आधारभूत किंमत जाहीर केली, ती आधीच तुटपुंजी आहे. राज्यातील उद्योग बाहेर जात असून बेरोजगाराच्या हाताला काम नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिकट परिस्थीती आहे. यामुळे जनतेमध्ये भाजपाच्या विरुध्द मोठया प्रमाणात रोष आहे. यामुळे सत्ताधारी भाजपा राज्यातील महापालिका, नगरपरिषद घेत नाही. गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुणे येथील व बाळू धानोकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर येथील लोकसभेची जागा रिक्त आहे. इतर राज्यात रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आला. परंतु पुणे व चंद्रपूर लोकसभा येथे पोटनिवडणूक सत्ताधारी भाजपा का घेतली नाही ? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

Story img Loader