लोकसत्ता टीम

यवतमाळ : महागाव तालुक्यात डेंग्यूची साथ पसरल्याने नागरिक घाबरले आहेत. तालुक्यात आठ दिवसांत डेंग्यूने तीन मृत्यू झाले. आज शनिवारी महागाव येथील एका व्यक्तीचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर मृतकांपैकी एक मृत हिवरा संगम आणि दोन डोंगरगाव येथील रहिवासी आहेत.

Wisdom tooth extraction recovery tips after operation expert advice
जर तुम्हालाही अक्कलदाढ असेल, तर हे वाचाच…, तज्ज्ञांनी सांगितले अक्कलदाढ काढल्यानंतर २४ ते २८ तास काय करावे…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती
No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
Continuous increase in GBS patients in Maharashtra
‘जीबीएस’ बळीनंतर केंद्र सरकार सावध; सोलापुरात रुग्णाचा मृत्यू; सात तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
जीबीएसच्या रुग्णांत मोठी वाढ अन् एकाचा मृत्यू! रुग्णसंख्या शंभरपार; निम्म्याहून अधिक ‘आयसीयू’त
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Palghar bird flu updates in marathi
पालघरमध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव नाही; पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची केली अंमलबजावणी

डोंगरगाव येथील सुहाना सय्यद इरफान या १० वर्षीय मुलीचा ४ ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. डोंगरगाव येथील शेख शायान शेख वाजाद या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर हिवरा संगम येथील रितिक्षा ऊर्फ सुरेखा मुलीचा याच आजाराने मृत्यू झाला. डोंगरगाव येथे आठवडाभरात दोन मुलांचा मृत्यू झाला. हे मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील मुलं या आजाराचे बळी ठरू नये म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने तातडीने ठराव घेत गावातील शाळा १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने एवढा मोठा निर्णय घेतला असताना डोंगरगाव ग्रामपंचायत, तसेच महागाव पंचायत समितीची यंत्रणा मात्र गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.

आणखी वाचा-भुजबळांना सल्ला देण्याची गरज नाही, राधाकृष्ण विखे पाटील असे का म्हणाले…?

डोंगरगाव हे ३ हजार ३०० लोकसंख्येचे गाव आहे. गावातील सुहाना शेख या मुलीचा ४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. ती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेची विद्यार्थिनी होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने ५ ऑक्टोबर रोजी ठराव घेऊन २० ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता झाला नाही.

डोंगरगाव येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाचा उद्रेक सुरू आहे. घरोघर तापाचे रुग्ण असताना आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील डेंग्यू, मलेरिया इतर संक्रमण आटोक्यात येईपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे पालकांनी ठरवले आहे. गावातील सरपंच शिवाजी हातमोडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. येथील उपसरपंच सय्यद ऐसान यांना सरपंचपदाचा प्रभार देण्यासाठी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे. तालुक्यात आरोग्य सेवा कोलमडली असताना जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह कोणीही तालुक्यात फिरकले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

Story img Loader