भंडारा : हॉटेलमध्ये जेवण आटोपून पुढच्या प्रवासासाठी पाचही जण गाडीत बसले. हॉटेलमधून गाडी महामार्गावरवर घेत असताना अचानक विरुद्ध दिशेने भरधाव ट्रक काळ बनून आला आणि चारचाकी वाहनाचा अक्षरशः चुराडा केला. रविवारी रात्री भंडारा येथे मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही ११ वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले, मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरकडून आलेले बोलेरो वाहन हे नागपूरकडे जात होते. यात ५ जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे.
अशोक फुलचंद डेहरवाल, शैलेंद्र लेखाराम बघेले, शैलेश पन्नालाल, गोकुळपुरे, मुकेश बिंजेवार या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अविनाश नाकतोडे जखमी आहे.भंडारा आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.