लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : दरवर्षीप्रमाणे यंदाही जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस तळ गाठतो आहे. अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाने तळ गाठल्याने बुधवार, १९ जूनपासून अंबरनाथकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंगळवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला.

palghar highway potholes marathi news
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्ग खड्डेमय, दोन दिवस झालेल्या पावसात बुजवलेले खड्डे उख़डले, खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीने रस्ते प्रवास नकोसा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Deonar Pada cemetery, Deonar Pada cemetery lights,
मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप
Water supply to Kalyan East and West cities will be shut off on Tuesday from 10 am to 4 pm
कल्याण शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
jayakwadi dam marathi news
Jayakwadi Dam: नाशिकमधून मराठवाड्याकडे ४८ टीएमसी पाणी, गंगापूरसह १२ धरणांमधून विसर्ग
panvel water latest marathi news
पनवेलमधील पाणी पुरवठा बंद
water supply will be stopped for eighteen hours in andheri and jogeshwari
अंधेरी, जोगेश्वरीत अठरा तास पाणी पुरवठा बंद; गुरुवारी व शुक्रवारी पाणी जपून वापरावे लागणार
thane traffic marathi news
ठाणे: विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल

अंबरनाथमधील सुमारे एक लाख लोकवस्तीला चिखलोली धरणातून दररोज सहा दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तर अंबरनाथमधील मोठ्या भागाला बदलापूर येथील बॅरेज बंधारा आणि बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दुसरीकडे बदलापूर शहरातही हेंद्रेपाडा येथील जलवाहिनीला मंगळवारी गळती लागल्याने बुधवारी पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. तर गुरुवारीही काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली आहे.

आणखी वाचा-भाज्या महागल्या; वातावरण बदलाचा फटका

यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्याने सर्वच जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे. बहुतांश ठिकाणी पाणी कपात सुरू करण्यात आली असली तरी ठाणे जिल्ह्यात अद्याप अधिकृतरित्या पाणी कपात जाहीर केलेली नाही. मात्र देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी कपात केला जात असल्याचा आरोप होतो आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात पाणीसाठा २५ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. तर अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणानेही तळ गाठला आहे. त्यामुळे मंगळवारी अंबरनाथ शहराचे पाणी व्यवस्थापन पाहणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चिखलोली धरणातून ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला.

बुधवार, १९ जून पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे चिखलोली धरणातून पूर्वेतील ज्या भागात पाणी दिले जाते त्या भागातील नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे लागणार आहे. ऐन पावसाळ्यात पाणी कपात झाल्याने नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. अंबरनाथ शहराला बारवी धरण, बदलापुरातील उल्हास नदीवरील बॅरेज बंधारा येथून पाणी दिले जाते.

आणखी वाचा-तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंद करू, डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता

बदलापुरातही पाणीबाणी

बदलापुरात पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागातील आमराई परिसरातील जलवाहिनीला गळती लागल्याने काही भागात बुधवार आणि गुरुवार अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे बदलापूरकराना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.