नागपूर : व्हीएनआयटीच्या आतून अखेर वाहतूक सुरू झाली. आयटीपार्क चौकाकडील व्हीएनआयटीच्या नव्या प्रवेशद्वारातून थेट यशवंतनगर चौकातील प्रवेशद्वारापर्यंत वाहने सोडण्यात येत होती. परंतु, एकेरी वाहतुकीचीच परवानगी असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.

अंबाझरीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्हीएनआयटीतून वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, व्हीएनआयटीच्या संचालकांनी सकाळी आणि सायंकाळी दोन तासच वाहतुकीस परवानगी दिली. तसेच आतील परिसरातून एकेरी वाहतुकीचाच आग्रह धरला. आयटीपार्क चौकाकडच्या नव्या प्रवेशद्वारातून वाहनचालकांना प्रवेश देण्यात आला. परंतु, यामुळे अंबाझरीतील वाहतूक कोंडीवर सक्षम पर्याय सापडलेला नाही. माटे चौक ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी कायमच आहे. यशवंतनगर चौकातील व्हीएनआयटीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी अनेक वाहनचालकांनी गर्दी केली होती. ते वाहतूक पोलीस आणि सुरक्षारक्षकांशी वाद घालून आतमध्ये सोडण्याची मागणी करीत होते. परंतु, अनेक वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी परत पाठवले.

MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
pune city traffic route changes marathi news
पुणे: शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद, मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
vasai virar latest news in marathi
वसई विरार शहरात वाहने झाली उदंड, वाहतूक कोंडीच्या समस्येत भर; वर्षभरात ८४ हजार वाहने रस्त्यावर
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
Accident News
Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल
Encroachment again on IT Park to Mate Chowk road
आयटी पार्क ते माटे चौक मार्गावर पुन्हा अतिक्रमण

हेही वाचा >>>आता सरळसेवा भरती ‘एमपीएससी’मार्फत होणार, शासन निर्णयात काय आहेत तरतुदी बघा

वेळ वाढवण्याची मागणी कायमच

सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास अशी वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, या रस्त्यावरील वाहनांची संख्या बघता दोन तास अपुरे आहेत. सायंकाळी ५ ते ९ यावेळेत वाहतुकीची कोंडी होते. मात्र, सायंकाळी ५ ते ७ अशीच वाहतुकीची वेळ ठरवण्यात आली आहे. त्यामुळे वेळ वाढवण्याची मागणी कायम आहे.

आमदारालाही फटका

यशवंतनगर प्रवेशद्वारातून एक आमदार कारने आले. त्यांनी आमदार असल्याची ओळख दाखवल्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्यांना आत सोडले. मात्र, बाहेर पडणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ एक पोलीस कर्मचारी तैनात होता. त्याने आमदाराला थांबवले आणि एकेरी मार्ग असल्याचे सांगून परत जाण्यास सांगितले. आमदार असल्याचे सांगितल्यानंतरही पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना नियम पाळण्यास सांगितले. त्यामुळे आमदार महोदयांनी नाईलाजाने परतीचा मार्ग पकडला.