गडचिरोली : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद झाले आहे. २ जवान जखमी असल्याचीही माहिती आहे. ही चकमक गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात घडली. परिसरात शोध मोहीम सुरु असून मृतांची संख्या वाढू शकते.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसराला लागून असलेल्या तोडका जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे दोन दलम लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबविली होती. दरम्यान, लपून असलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जावनांनीही प्रत्युत्तर दिले. यात ३१ नक्षलवादी ठार झाले. तर २ जवान शहीद व २ जवान गंभीर जखमी झाले आहेत.

nagpur boeing companys project to convert passenger planes into cargo planes
नागपुरात मालवाहू विमानांची निर्मिती
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
deformed youth who came to fix shutters of shop near school molested 17 school girls
नागपूर:विकृतपणाचा कळस , १७ शाळकरी मुलींशी चाळे
Four girls shared room one ordered pizza in her hostel admission cancellation
पिझ्झा मागवल्याने समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थिनींची हकालपट्टी, काय आहे प्रकरण बघा…
delhi marathi sahitya sammelan
साहित्य संमेलनाला राज्य सरकारचे ‘अनपेक्षित’ बळ, आवश्यक सुविधांसाठी खास ‘दूत’ नेमल्याने आयोजकही अवाक
substandard pesticides used in field led to penal action against concerned company
अप्रमाणित कीटकनाशक करताहेत शेतकऱ्यांचा घात!
OBC students are not yet eligible for the benefit of Aadhaar scheme
ओबीसी विद्यार्थांना आधार योजनेचा लाभ अद्याप नाहीच, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली
government failed to purchase soybeans from registered farmers affecting thousands of soybean growers
नोंदणीनंतरही सोयाबीन खरेदी नाहीच, शेतकऱ्यांना फटका, तर फरकाची रक्कम…

मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतररित होत आहेत. तसेच बॉर्डरवर अंतर्गत भागात बैठकाही घेत आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बिजापूर जिल्ह्यात ही कारवाई केली. चकमकस्थळ गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ आहे. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. तीन जिल्ह्यांतील सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी शस्त्रेही जप्त केली आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपविण्याची घोषणा केल्यानंतर छत्तीसगड गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरु आहेत. चालू वर्षात ७० हून अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे.

नक्षलमुक्त भारतचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सुरक्षारक्षकांना छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठे यश मिळाले आहे. ही कारवाई करताना शहीद झालेल्या जवानांचा देश सदा ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. त्याबरोबरच ३१ मार्च २०२६च्या आधी देशातून नक्षलवाद मुळापासून नष्ट करण्याच्या संकल्पाची पुनरावृत्ती करतो.

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

Story img Loader