नागपूर : निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांचे महत्त्व कळू लागले आहे. त्याला जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपाही त्याला अपवाद नाही. भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना नेत्यांना कार्यकर्त्यांचे महत्त्व समजावून सांगितले.

भाजपाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्त सुधाकर कोहळे यांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. त्यात गडकरी बोलत होते. पक्षाच्या पडत्या काळात कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टामुळेच आज भाजपाला चांगले दिवस आले हे विसरून चालणार नाही. त्यामुळे तो दुरावणार नाही याची काळजी घ्या,असे गडकरी म्हणाले. हे सांगताना त्यांनी सायकलचे उदाहरण दिले.

kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात

हेही वाचा – “मोहनदास गांधी मुस्लीम पुत्रच!” संभाजी भिडेंचा पुनरुच्चार; मुस्लीम धर्माविषयी बोलताना जीभ घसरली

हेही वाचा – रेल्वे विलंबास तांत्रिक बिघाडाचे कारण ६० टक्के 

गडकरी म्हणाले “सायकल कितीही चांगली असेल, नवीन असेल, पण तिचा व्हॉल्व फुटला असेल तर ती चालत नाही. तिचा काहीही उपयोग होत नाही. सायकल चांगली चालावी असे वाटत असेल तर ‘व्हॉल्व’ही चांगलाच असावा लागतो. कार्यकर्ता हा पक्षाच्या सायकलचा ‘व्हॉल्व’ असतो. त्याला टिकवा ”