आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने निघाली आहेत. करोनामुळे गत दोन वर्षांपासून खंडित झालेली पंढरपूर पायी वारीची ‘श्रीं’च्या पालखीची परंपरा यंदा पूर्ववत झाली. संतनगरी शेगाव येथून राजवैभवी थाटात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने ७०० वारकऱ्यांसह सोमवारी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीतीमुळे संतनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले, टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर निनादला.

यंदा ५३ वे वर्ष

pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
Buldhana, Motala , dabhadi robbery, wife murder ,
बुलढाणा : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टर पतीने संपवले; दरोड्याचा रचला डाव, पण…
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
Maruti Chitampalli migration story
विदर्भाशी नाळ जुळलेल्या “पद्मश्री” अरण्यऋषींचे वेदनादायी स्थलांतर
landslide in left main canal of Tilari Dam
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड; त्यामुळे रस्ता, शेती, बागायतीमध्ये पाणी
koliwada villagers closes jnpa sea channel for rehabilitation
जेएनपीए विस्थापित कोळीवाडा ग्रामस्थ पुन्हा आक्रमक; पुर्नवसनासाठी जेएनपीए समुद्र चॅनेल बंद केले

‘श्रीं’च्या पंढरपूर पालखी पायी वारीचे यंदा ५३ वे वर्ष आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायी वारीची परंपरा कायम ठेवली. मात्र, करोना प्रादुर्भावामुळे गत दोन वर्षांपासून पायी वारीमध्ये खंड पडला होता. यावर्षी ही परंपरा पूर्ववत झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सकाळी विधिवत पूजा करून पालखीने नगर परिक्रमा केली. त्यानंतर ही पालखी नागझरीकडे रवाना झाली. वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी-भक्त यांची संपूर्ण व्यवस्था ‘श्री’ संस्थानकडून केली जात आहे.

असा राहील पालखीचा प्रवास

‘श्रीं’ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर मार्गाने एकूण ७५० किलोमिटर प्रवास करीत ०८ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होईल. १२ जुलैपर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम राहील. आषाढी एकादशी सोहळा आटोपल्यावर १३ जुलै रोजी सकाळी ‘श्रीं’ची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. ३ ऑगस्ट रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.

Story img Loader