लोकसत्ता टीम

बुलढाणा : मुबलक पाणी उपलब्ध पण गावाला वीस- पंचवीस दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने मलकापूर पांग्रा वासीयांचे बेहाल होत आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढला. यामुळे पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली असतानाच गावकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन ५ सदस्यांनी पदाचे राजीनामे दिले.

Lakadganj police station is in discussion due to the controversial affairs
नागपूर : गंगाजमुनातील वारांगना; पोलिसांचा छापा अन् ग्राहकांची पळापळ…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
trade stop due to the closure of the market committees in West varhad
अकोला: बाजार समित्या बंद! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प…
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Villagers set fire to police outpost in West Bengal after 9-year-old girl’s rape-murder
Rape and Murder Case : धक्कादायक! नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, संतप्त गावकऱ्यांनी पोलीस चौकीच पेटवली!
Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
Marijuana cultivation behind cotton tur crops in dhule
कापूस, तूर पिकांच्याआड गांजाची शेती

पिण्याच्या पाण्यासाठी मागील चार महिन्यांपासून गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे .मुबलक पाणी साठा असूनही वीस ते पंचवीस दिवस नळाला पाणी येत नसल्यामुळे , महिलांच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला. महिलांनी घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला . यामध्ये गावातील शंभर ते सव्वाशे महिला हंडे व घागर घेऊन “पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा” अश्या घोषणाबाजी करीत होत्या. हा मोर्चा ग्रामपंचायत वर येऊन धडकला. यावेळी खडाजंगी उडाली. सरपंच व ग्रामसेवक यांनी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र यामुळे गावकऱ्यांचे समाधान झाले नाही.

पाच सदस्यांचे सामूहिक राजीनामे

ग्रामपंचायत सदस्य नात्याने तोंड द्यावे लागत असल्यामुळे सामूहिक राजीनामे देत असल्याचे पाच सदस्यांनी जाहीर केले. ग्राम विकास अधिकारी वसंत चेके यांच्याकडे त्यांनी राजीनामे दिले.यामध्ये गंगुबाई साळवे, समीनाबी निसार पटेल, किरण काकडे, साबिर खा पठाण, संगीता राधाकिसन देशमुख यांचा समावेश आहे.