लोकसत्ता टीम

बुलढाणा : मुबलक पाणी उपलब्ध पण गावाला वीस- पंचवीस दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने मलकापूर पांग्रा वासीयांचे बेहाल होत आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आज ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढला. यामुळे पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली असतानाच गावकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन ५ सदस्यांनी पदाचे राजीनामे दिले.

NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chemicals are now used to eliminate mosquitoes in vasai
वसई : डास निर्मूलनासाठी आता रसायनाचा वापर, डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी निश्चित
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली
MMRDA, third Mumbai, land acquisition, farmers,
एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात

पिण्याच्या पाण्यासाठी मागील चार महिन्यांपासून गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे .मुबलक पाणी साठा असूनही वीस ते पंचवीस दिवस नळाला पाणी येत नसल्यामुळे , महिलांच्या वतीने घागर मोर्चा काढण्यात आला. महिलांनी घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला . यामध्ये गावातील शंभर ते सव्वाशे महिला हंडे व घागर घेऊन “पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा” अश्या घोषणाबाजी करीत होत्या. हा मोर्चा ग्रामपंचायत वर येऊन धडकला. यावेळी खडाजंगी उडाली. सरपंच व ग्रामसेवक यांनी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र यामुळे गावकऱ्यांचे समाधान झाले नाही.

पाच सदस्यांचे सामूहिक राजीनामे

ग्रामपंचायत सदस्य नात्याने तोंड द्यावे लागत असल्यामुळे सामूहिक राजीनामे देत असल्याचे पाच सदस्यांनी जाहीर केले. ग्राम विकास अधिकारी वसंत चेके यांच्याकडे त्यांनी राजीनामे दिले.यामध्ये गंगुबाई साळवे, समीनाबी निसार पटेल, किरण काकडे, साबिर खा पठाण, संगीता राधाकिसन देशमुख यांचा समावेश आहे.

Story img Loader