अकोला : जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिसूचना जारी करून २५ टक्के विम्याची रक्कम अग्रीम देण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली होती. प्रशासनाने सर्व्हे करून अधिसूचना काढण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात एकूण ५२ महसूल मंडळ आहेत. यामध्ये सर्वच महसूल मंडळात पावसाचा प्रदीर्घ खंड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २५ टक्के विम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी होत होती. यासंदर्भात महसूल व कृषी विभागामार्फत ५२ महसूल मंडळांमध्ये सर्व्हेसुद्धा करण्यात आला. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ५२ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिसूचना काढण्यात यावी, असे ठरले आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

cidco protest for water news
नाशिक : सिडकोत पाण्यासाठी आंदोलन, महापालिकेचा निषेध
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Kaustubh Pol wrote later to Kolhapur District Collector demanding proper disposal of illegally cremated crocodile
सांगलीत मृत मगरीच्या अंत्यसंस्कारावरून वाद, मृतदेहाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची मागणी
three bodies found in lake in tuljapur taluka
तलावात आढळले तीन मृतदेह; तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात खळबळ
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप

हेही वाचा – महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेतील गुणांच्या सीमारेषेची ‘स्‍पर्धा’ चर्चेत; कारण काय, वाचा…

बैठकीत जिल्हाधिकारी अजित कुंभार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले, तर प्रभारी जिल्हाधिकारी वैष्णवी बी., निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सोयाबीनचे सुमारे २ लाख १५ हजार हेक्टर संरक्षित क्षेत्रातील शेतकऱ्यांना अग्रीम देण्याबाबत जिल्हाधिकारी अधिसूचना काढणार आहेत.

हेही वाचा – “भारतात जेवढे वाईट होते, त्याहून ४० पट चांगले काम होते,” सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत; म्हणाले…

जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत अधिसूचना जारी करून तसा प्रस्तावदेखील विमा कंपनीला पाठवला. मात्र, अद्यापही नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आता तरी अधिसूचनेनुसार २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

Story img Loader