वाशीम : पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. ‘प्रीमियम’ भरूनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांची सरकारला काळजी आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला सरकारकडे वेळ नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला.

वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी रिसोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पीक विमा हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तुपकर म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे म्हणाले होते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दिली नाही तर सरकारच्या बुडाखाली आग लावून मुंबई येथील पीक विमा कंपनीचे कार्यालय उद्ध्वस्त करू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Danger , dumping , steel, aluminum ,
पोलाद, ॲल्युमिनियमच्या ‘डम्पिंग’चा भारताला धोका; आयातीवर २५ टक्के कर लावण्याची अमेरिकेची धमकी देशी उत्पादकांना मारक  
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
government failed to purchase soybeans from registered farmers affecting thousands of soybean growers
नोंदणीनंतरही सोयाबीन खरेदी नाहीच, शेतकऱ्यांना फटका, तर फरकाची रक्कम…
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
Will Meghe Medical Group be taken over by Adani
मेघे वैद्यकीय समूह अदानी टेक ओव्हर करणार? नेमके काय घडले…
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय?
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महायुती सरकारने तीन लाख ७० हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Soybean Rate : महायुतीचे सोयाबीन खरेदीचे दावे, तरीही शेतकरी संकटातच; काय आहे कारण?
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी

हेही वाचा >>> नागपूर : ‘एसटी’तीलही अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांनाही लाभ, महामंडळाकडून अखेर आदेश निघाले

सरकार आणि विमा कंपनीचे साटेलोटे

वेळेत प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात कंपनी टाळाटाळ करीत आहे. रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची तर कंपनीने थट्टा सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे. सरकार आणि विमा कंपनीचे साटेलोटे असल्याचा आरोपही तुपकर यांनी केला.

Story img Loader