राजेश्वर ठाकरे

नागपूर : राज्यात जादूटोणाविरोधी कायदा झाल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे उपक्रम राबविता यावेत, यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, शासकीय अनास्थेमुळे समितीचे काम पुढेच सरकत नसल्याचे चित्र आहे. चालू आर्थिक वर्षांत २२ कोटी रुपये मंजूर असले तरी हा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होण्याची शक्यता सध्यातरी नाही.

Budget 2025 News Tax regime slabs
१ हजार रुपये अधिक उत्पन्नामुळे ६० हजारांचा फटका, टॅक्सच्या भितीने नोकरदारांवर पगार कमी करून घेण्याची वेळ
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Union Budget 2025
Union Budget 2025 : “हे बजेट भारताचे नाही तर…”, निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका
Budget 2025
Budget 2025 : तुमचा वार्षिक पगार १२ लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार? समजून घ्या सोपं गणित
Budget 2025 News
Budget 2025 : १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; १ लाख कोटींचा तोटा सहन करत मध्यमवर्गाला भेट
Budget 2025 News
Budget 2025 : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, ‘या’ सात घोषणांची शक्यता!
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
black budget 1973 indira gandhi
Budget 2025: इंदिरा गांधींच्या काळात सादर झालं होतं ‘ब्लॅक बजेट’, पण या अर्थसंकल्पात असं काय होतं?

महाराष्ट्रात २०१३ रोजी जादूटोणाविरोधी कायदा आला. कायद्याविषयी जनगजागृतीसाठी २०१४ साली ‘प्रचार-प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती’ स्थापन करण्यात आली. ही समिती सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत काम करते. सामाजिक न्यायमंत्री हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, तर अंनिसचे प्रा. शाम मानव सहअध्यक्ष आहेत. समितीने २०१४ साली कामाचा आरखडा तयार केला आहे. प्रारंभी साडेसोळा कोटी रुपये मंजूर झाले. सरकार बदलले आणि काम ठप्प झाले. त्यानंतर करोनामुळे दोन वर्षे वाया गेली. सध्या खात्याला मंत्री नाही.

आराखडा ‘कागदा’वरच !

जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी समितीने आराखडा तयार केला. जिल्हा, तहसील तसेच १० हजार लोकवस्ती असलेल्या गावात सभा घेणे, पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, शाळा-महाविद्यायात शिबिरे घेणे असे मोठे नियोजन आहे. त्यासाठी दोनशेहून अधिक वक्ते तयार करण्यात आले. मात्र आतापर्यंत समितीने केवळ तीन शिबिरे आयोजित केली आहेत. राजकीय इच्छाशक्तीअभावी सगळे नियोजन केवळ कागदावरच राहिले आहे.  

मुख्यमंत्र्यांकडे कामाचा व्याप अधिक असल्याने समितीच्या कामाला ते वेळ देऊ शकत नाहीत. सामाजिक न्याय खात्याला स्वतंत्र मंत्री असायला हवेत. तसेच समितीच्या उपक्रमांना सरकारने प्राधान्य द्यायला हवे.

– प्रा. श्याम मानव, सहअध्यक्ष, प्रचार-प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती

Story img Loader