देशभरातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच अनेक प्रकल्पांना लेटमार्क लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सरकारच्या हस्तक्षेपावरून त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. नागपूरच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले की, “गॉड आणि गर्व्हनमेंटवर आपल्या सगळ्यांचा विश्वास असतो. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग किंवा सरकारची छाया देखील ज्या प्रकल्पावर पडते तो प्रकल्प नष्ट होतो, या थेअरीचा मी समर्थक आहे. सरकार म्हणजे विषकन्येसारखं असतं. सरकारपासून जो दूर राहील तो प्रगती करू शकेल.” सरकारच्या हस्तक्षेपावर नितीन गडकरी यांनी थेट भाष्य केल्याने यावरून आता पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
pcmc issue seized notice to Hotels hospitals schools and educational institutions over property tax arrears
पिंपरी : थकबाकी असलेले हॉटेल, रुग्णालय, शाळा होणार जप्त
Atishi alleges Arvind Kejriwal murder conspiracy
Atishi : अरविंद केजरीवालांच्या हत्येचा कट, मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप; म्हणाल्या, “दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, कारण…”
Nitin Gadkari
Nitin Gadkari: “… तर मीच बुलडोझर घेऊन येतो”; नितीन गडकरींचा सज्जड दम, कारण काय?

गडकरींना खंडणी मागणारा सूत्रधार अखेर सापडला

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींच्या खंडणी मागून बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा याला नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला नागपुरात आणले असून त्याची आणि जयेश पुजारी याची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. 

हेही वाचा >> गडकरींना खंडणी मागणारा सूत्रधार अखेर गवसलाच; दहशतवादी अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात

२१ मार्चला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालात बेळगाव कारागृहातून जयेश पुजारी याने तीन फोन केले व  १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोटात उडविण्याची धमकी दिली. या प्रकरणात पहिल्यांदा बेळगाव कारागृहातून जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Story img Loader