वर्धा : पैसे घेऊन चुकलेला चूक झाल्यास पैसे परत करेल, याची खात्री नसल्याचा अनुभव अनेकांनी घेतल्याचे चित्र साधारण आहे. पण एकाची खात्री मात्र दिल्या जाते. शासनाने घेतलेल्या पैशाचा रेकॉर्ड असतो. म्हणून चूक घेतलेले पैसे चुकीने, असे दिसून आल्यास शासनास पैसे परत करावे लागतात.असेच हे उदाहरण. राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद अर्थात नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स या संस्थेतर्फे एक अभ्यासक्रम पुरुस्कृत होता. तो म्हणजे चार वर्षीय बी. ए. / बिएस्सी बिएड ( एकात्मिक ). आता तो बंद करण्यात आला. त्या ऐवजी चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम सूरू करण्यात आला आहे. हा बदल झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २०२५ – २६ पासून चार वर्षाच्या बीए / बीएससी बीएड अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आणि केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येवू नये असे स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा