वाशिम: सरकारी शाळा चालविण्याची ऐपत नसेल तर सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे खाजगी उद्योजकांना शाळा चालवण्यास देण्याच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या व इतर सर्व सरकारी शाळा विकण्याचा सरकारचा डाव उधळुन लावू असा निर्धार महाराष्ट्र शिक्षण बचाव समन्वय समितीचे’ राज्य समन्वयक रमेश बीजेकर यांनी केला.

स्थानिक अकोला नाका येथील नगर परिषद कॉम्प्लेक्स येथे शाळा बचाव समितीची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी शाळा टिकविण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात आला. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘महाराष्ट्र शिक्षण बचाव समन्वय समितीचे’ राज्य समन्वयक रमेश बीजेकर नागपूर हे उपस्थित होते.

Ganeshotsav was coming to an end in Solapur district anandacha shidha did not reach to people
गणराय निघाले तरी सोलापूर, ‘आनंदाचा शिधा’पासून वंचित
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sharad pawar
शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
nandgaon in nar par damanganga river linking project marathi news
नार-पार योजनेच्या पाण्यासाठी जनहित याचिका, समन्यायी तत्वावर वाटपासाठी जलहक्क समिती आग्रही
ratnagiri mirya midc marathi news
रत्नागिरीतील मिऱ्या एमआयडीसीला ग्रामस्थांचा ठाम विरोधच; बैठकीत निर्णय
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?
maharashtra cabinet approves new unified pension scheme for Its
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुधारित निवृत्तिवेतन योजना; अखेरच्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

हेही वाचा… मोर पाऊस पडल्यानंतरच का नाचतो, माहिती आहे का?

दि. ५ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमांमध्ये शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील सरकारी शाळा ह्या ‘कॉर्पोरेट सेक्टर’ ला चालविण्यास देणार असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे राज्यातील सरकारी शाळा ह्या उद्योग समूहांना विकण्याचा सरकारचा अजेंडा असल्याचे उघड झाले आहे. सरकारने मागील वर्षी २० पटाच्या आतील महाराष्ट्रातील १५ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षकांना घेणार असल्याचेही सरकारने जाहिर केले होते. आणि आता सर्व सरकारी शाळा खाजगी ऊद्योगपतींना विकण्याचा घाट घातला आहे. मात्र याविरोधात लढा उभारण्यात येणार आहे.