लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यातील पोलीस शिपाई ते पोलिस निरीक्षकांपर्यंत १५ दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याचा आदेश गृहमंत्रालयाने काढला होता. या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस दलातून नाराजीचा सूर उमटला होता. ‘लोकसत्ता’नेही याबाबत पाठपुरावा केला होता. यानंतर अखेर राज्य सरकारने माघार घेत हा अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीचा निर्णय पुन्हा जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.

cabinet nod to acquire 256 acres of salt pan land for Dharavi housing scheme
मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्त; २५६ एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इमारती बांधण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
the cabinet is angry at the behavior of the officials Mumbai
अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर मंत्रिमंडळाचा संताप
mcoca action against NK gang leader and accomplices in Yerwada
येरवड्यातील एन.के. गँगच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
The state government plans to start work on ambitious projects in the state before the implementation of the code of conduct for assembly elections
४५ हजार कोटींच्या प्रकल्पांना गती; आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

राज्यातील पोलिसांना १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत दिली जात होती. मात्र, २१ फेब्रुवारीला शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय जारी करत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या या सवलतीवर गदा आणली. गृहमंत्रालयाने अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याचा आदेश गृहमंत्रालयाने काढला होता. त्यानंतर संपूर्ण राज्य पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. अनेक अधिकाऱ्यांना समाजमाध्यमांवरून गृहमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करून आपली खदखद व्यक्त केली होती. अन्य शासकीय विभागाप्रमाणे शनिवार-रविवार सुटी नसल्यामुळे अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी लागू केली होती. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती सवलत रद्द केल्यामुळे राज्यभर असंतोष पसरला होता.

आणखी वाचा-“पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना तोंड कसे दाखविणार? उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी निम्म्यावर आणले”, शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टीका

अनेक पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी फेसबुक, ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर शासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध आवाज उठवला होता. तसेच ‘लोकसत्ता’नेही पोलीस कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरत ‘रजा रोखीकरण केल्यामुळे पोलीस दलात नाराजी’ असे वृत्त प्रकाशित केले होते. दोन दिवसांतच गृहमंत्रालयाने रजा रोखीकरण रद्द केल्याबाबतचा शासन निर्णय मागे घेतला. त्यामुळे राज्यातील पोलिसांना दिलासा मिळाला. शासन निर्णय रद्द झाल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनीसुद्धा आनंद व्यक्त केला आहे.

रजा रोखीकरण म्हणजे काय?

राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांनाही ३० दिवसांच्या हक्काच्या अर्जीत रजा असतात. मात्र पोलिसांनी त्या रजा उपभोगता येत नाही. तसेच पोलिसांना शनिवार-रविवार सुट्टीसुद्धा नसते. सण-उत्सवातही सुट्या घेता येत नाही. ही बाजू लक्षात घेता सरकारने पोलिसांना १५ दिवसांच्या रजा रोखीकरणाची सवलत देण्यात आली होती.

आणखी वाचा-बुलढाण्यातही गन कल्चर फोफावतेय, ६ देशी पिस्तूलसह काडतूस जप्त

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे रक्कम द्यावी

राज्य पोलीस दलातील पोलीस कर्मचारी ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना १९८९ पासून वर्षांला १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा व निवृत्त होताना रजेचे रोखीकरण (एन्कॅशमेंट) करण्याची सुविधा लागू केली आहे. मात्र, रजा रोखीकरणाचे पैसे हे सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येतात. सध्या सातवा वेतन आयोग लागू असल्याने रजा रोखीकरणाची रक्कम नव्या वेतन आयोगाच्या तफावतीनुसार देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.