प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा: लोकसेवा आयोगामार्फत निवड होत राजपत्रित अधिकारी होण्याचे प्रत्येक होतकरू सुशिक्षीत तरूणाचे ध्येय असते आणि निवड झाल्यावर कधीतरी सनदी अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, अशी सुप्त ईच्छा तो बाळगून असतात. मात्र निवडकांनाच अशी संधी प्राप्त होते. अशीच संधी आता राज्यातील काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे. तसे नोटिफिकेशन केंद्र सरकारच्या विनंतीने राष्ट्रपती भवनातून निघाले आहे.

Refund if higher salary demand guarantee from ST employees
मुंबई : जास्त वेतन आल्यास परत द्या, एसटी कर्मचाऱ्यांकडून हमीची मागणी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
meerut building collapse update
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, आठवड्याभरातली दुसरी घटना
95 percent increase in cost of Versova Bay Madh connecting project ravi raja Mumbai news
वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
unauthorized hawkers, Andheri,
अंधेरीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा; परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी पालिकेची कार्यवाही
Bullock carts and horses also on the road in protest against potholes in Nashik
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर
ST services disrupted across the state ST organization meeting with Chief Minister
एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत, एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

राज्यातील खालील अधिकाऱ्यांना आता आयएएस अधिकाऱ्याचा दर्जा बहाल होणार आहे. जी.एम.गढीकर, पी.बी.खपले, ए.पी.पाठक, जी.आर.खरात, डॉ.पी.पी.देवरे, एम.डब्लू.साळवे, एम.पी.देशमुख, डॉ.बी.एन.बस्तेवाड. यांना १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या दरम्यान रिक्त झालेल्या जागांवर नियूक्ती मिळेल.

हेही वाचा… काय सांगता! लायसन्स बनवायला आरटीओत गेला अन् कार गमावून बसला…

तर १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या दरम्यान रिक्त झालेल्या जागांवर सतिशकुमार दत्तात्रय खडके, संजय श्रीपतराव काटकर, डॉ.माधव नामदेव कुसेकर, पराग सुरेश सोमण, अनिलकुमार खंडेराव पवार, सचिन बंडोपंत कलंत्रे, श्रीधर बापुराव दुबे, विकास मारोती पानसरे व मनोज विजय रानडे यांना आयएएसच्या दर्जा बहाल करीत नियूक्ती मिळेल. प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांना नियूक्ती मिळण्याची शक्यता आहे. वर्धा येथे जात पडताळणी अधिकारी म्हणून कार्यरत जी.एम.गढीकर यांचाही यास समावेश झाला आहे.