चंद्रपूर: ऐन पावसाळ्यात १५ दिवसापासून पाऊस गायब झाल्याने चंद्रपूर शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. तापमानाने ३५ ते ४० अंशाचा पारा गाठला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना कुलर व वातानुकूलित यंत्रणेचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळा कि, उन्हाळा असा प्रश्न पडला आहे. पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धानपिके करपण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा >>>किनगाव राजाचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात, अटक टाळण्यासाठी मागितली लाच; गुन्हा दाखल

weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
weather department expressed possibility of increasing heat in Mumbai for next one or two days
मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Temperature drop in Mumbai, Temperature ,
मुंबईच्या तापमानात घट
Loksatta Chatura Nature Change of seasons and moments of joy in the garden
निसर्गलिपी: ऋतू बदल आणि बागेतील आनंदाचे क्षण

सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून चंद्रपूरला ओळखले जाते. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात पावसाने दीर्घ काळ उघडीप दिल्याने चंद्रपूर शहरात चक्क उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. तापमान ३५ ते ४० डिग्रीच्या घरात गेले आहे. शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवसा कडक उन्ह व चिडचिडी गरमीने नागरिक हैराण झाले आहे. पावसाळा लागताच बंद करून ठेवलेले कुलर नव्याने लावाले लागत आहे. नागरिकांना रात्री कुलर व वातानुकूलित यंत्राचा वापर अत्यावश्यक झाल्याचे विचित्र चित्र आहे. मागील १५ दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने कापूस सोयाबीन व धान पिके पाण्याविना करपण्याच्या मार्गावर आहेत.

Story img Loader