नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागू केली आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्येक दोन आर्थिक वर्षांत एकदा ११ प्रकारच्या तपासण्या बंधनकारक राहणार असून, त्याचा खर्चही महामंडळ उचलणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणीअंतर्गत सीबीसी, थायरॉईड, ब्लड शुगर एचबीएआयसी, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, बोन डेन्सिटी, एक्स-रे-ईसीजी, सीआरपी टेस्ट, आय टेस्ट, मॅमोग्राफी (फक्त महिलांसाठी) या तपासण्या करणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही योजना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च दरम्यान लागू आहे. परंतु, बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ही तपासणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामंडळाने तपासणीबाबत पत्र काढले आहे. महामंडळात एकूण ८६ हजारांच्या जवळपास कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे ६० टक्के कर्मचारी चाळिशी ओलांडलेले आहेत. या सर्वांना दोन आर्थिक वर्षात एकदा या तपासणी करायच्या आहे. वरीलपैकी एकही तपासणी न केल्यास या रकमेची प्रतिपूर्ती महामंडळ करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात…

एसटी महामंडळाबाबत..

एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा दिली जाते. प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. सोबत आणखी नवीन इलेक्ट्रिकसह इतरही बसेस उपलब्ध केली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.

”चाळिशी ओलांडलेल्या ५० हजार कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केव्हा होणार? हा प्रश्नच आहे. तातडीने शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे.”– अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

”नागपूर विभागातील काही चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. इतरही तपासण्या लवकर करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.”- विनोद चवरे, नागपूर विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.

चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणीअंतर्गत सीबीसी, थायरॉईड, ब्लड शुगर एचबीएआयसी, कोलेस्ट्रॉल, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, बोन डेन्सिटी, एक्स-रे-ईसीजी, सीआरपी टेस्ट, आय टेस्ट, मॅमोग्राफी (फक्त महिलांसाठी) या तपासण्या करणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही योजना १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च दरम्यान लागू आहे. परंतु, बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी ही तपासणी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामंडळाने तपासणीबाबत पत्र काढले आहे. महामंडळात एकूण ८६ हजारांच्या जवळपास कर्मचारी आहेत. त्यापैकी सुमारे ६० टक्के कर्मचारी चाळिशी ओलांडलेले आहेत. या सर्वांना दोन आर्थिक वर्षात एकदा या तपासणी करायच्या आहे. वरीलपैकी एकही तपासणी न केल्यास या रकमेची प्रतिपूर्ती महामंडळ करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>“गडचिरोलीत ‘सोशल पोलिसिंग’मुळे नक्षल चळवळीला तडा,” पोलीस अधीक्षक निलोपत्पल म्हणतात…

एसटी महामंडळाबाबत..

एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या व महत्वाच्या ठिकाणी २४७ आगारे व ५७८ बसस्थानकांमार्फत वाहतूक सेवा दिली जाते. प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी महामंडळाने अभिनव योजना अंमलात आणल्या असून प्रामुख्याने बसेसच्या रचनेत व रंगसंगातील बदल करण्यात आलेला आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेसह परिवर्तन बसेस, अधिक आरामदायी आसनव्यवस्थेसह निमआराम बसेस महामंडळाने पुरविलेल्या आहेत. सोबत आणखी नवीन इलेक्ट्रिकसह इतरही बसेस उपलब्ध केली जात असल्याचे एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.

”चाळिशी ओलांडलेल्या ५० हजार कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केव्हा होणार? हा प्रश्नच आहे. तातडीने शिबिरे आयोजित करण्याची गरज आहे.”– अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

”नागपूर विभागातील काही चाळिशी ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झाल्या आहेत. इतरही तपासण्या लवकर करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.”- विनोद चवरे, नागपूर विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ.