सलग दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतातील उभे पीक गारपिटीने ध्वस्त झाले आहे. कारंजा तालुक्यातील सेलगाव, धमकुंड, जुनापणी या गावात गारा पडल्याने संत्रा बागांना तडाखा बसला. शोभा गाखरे यांच्या बागेतील चाळीस झाडे आडवी झाली. समुद्रपुर तालुक्यात अनेक गावातील उन्हाळी भाजीपाला मातीमोल झाला. पालक,कोथिंबीर, टोमॅटो व अन्य फळभाज्या सडल्या.

हेही वाचा >>>अकोला: भक्तीत तल्लीन भाविकांवर काळ बनून वादळ कोसळले; सभामंडपावर वृक्ष पडून सात जणांचा मृत्यू, २६ जखमी

person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
heavy rain Gondia district,
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
Death mother daughter Gondia, snake bite Gondia,
गोंदिया : सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
Heavy rains in Buldhana district cause severe damage to crops
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली
hundred percent water storage in Ujani dam in Solapur district
उजनी धरणाचे पाणी अखेर कुरनूर धरणात पोहोचले; अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना होणार लाभ
Heavy rain in Yavatmal many villages flooded and flood in Panganga river
यवतमाळात मुसळधार, अनेक गावांत पाणी शिरले; पैनगंगा नदीला पूर

सेलू तालुक्यातील पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. पावसामुळे दोन हेक्टर वरील पपई बाग कोसळली आहे. काही ठिकाणी फळं झडली. देवळीत गहू, चारापीक, भाजीपाला,आर्वीत भाजीपाला,आष्टी तालुक्यात गहू,हरभरा व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे कृषी खात्याने नमूद केले. हा प्राथमिक अंदाज असून प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यावर नुकसान नेमके कळणार आहे