बुलढाणा : घाटाखालील नांदुरा तालुक्याला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे.शनिवारी रात्री झालेल्या पावसाने तब्बल ११६ कुटुंब निराधार झाले असून २६ घरांची पडझड झाली आहे. याशिवाय ६७ जनावरे बेपत्ता वा दगावल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून झाले.तालुक्यातील महाळुंगी ( ८४ मिमी) व वडनेर( ८१.५ मिमी) महसूल मंडळात अतिवृष्टी ने थैमान घातले. यामुळे शेतात पाणी साचल्याने खरीप पिकांची मोठी नासाडी झाली आहे. याशिवाय माळेगाव येथे ६ , धानोरा विटाळ ३, लोणवडी १२, खडतगाव मधील १० घरांची तर डिघी येथील गोदामाची पडझड झाली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे हजारो ग्रामस्थांचे बेहाल झाले. माळेगाव येथील ५०, लोणवडी मधील ६० तर वडाळी मधील ६ कुटुंबे निराधार झाली आहे. अतिवृष्टीग्रस्त लोणवडी मधील १० म्हैस, ३बैल, ७ गाई , ६ गोऱ्हे तर ४१ बकऱ्या पाण्यात वाहून बेपत्ता झाल्या वा मृत्युमुखी झाल्या आहे.दुसरीकडे अतिवृष्टी वा पुराचे पाणी शिरल्याने खरीप पिके व भाजीपाल्याचे नुकसान झाले. रसुलपूर, महाळुंगी, पिंपळगाव धांडे, वसाडी बुद्रुक, वाडी, बाभूळगाव, खडतगाव, तिकोडी, नायगाव, माळेगाव, मुरंबा, पोटळी, लोणवडी या गावातील पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

In Beed district around 1250 tippers are used for transporting sand and ash
बीड जिल्ह्यात साडेबाराशे टिप्पर; परळीत सर्वाधिक पावणेतीनशेंची संख्या
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Zero response for 713 houses out of 2264 houses of MHADA Konkan Board
म्हाडा कोकण मंडळाच्या घराकडे इच्छुकांची पाठ, २२६४ घरांपैकी ७१३ घरांना शून्य प्रतिसाद
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
lottery for 2264 houses of mhadas Konkan Mandal which postponed three times has finally release on 5th February
अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीला मुहूर्त मिळाला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ फेब्रुवारीला सोडत
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
Story img Loader