लोकसत्ता टीम

नागपूर : अंबाझरी तलावाजवळून पुढे शंकरनगर, रामदासपेठ, बर्डीकडे वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात पक्के बांधकाम, काँक्रिटचा मलबा आणि तत्सम प्रकारचे अडथळे आल्याने पाणी शेजारच्या वस्त्यांमध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
Farmers of Yavatmal district support Shaktipeeth highway
शक्तिपीठ महामार्गाला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे समर्थन; भूसंपादन प्रक्रिया तत्काळ…

शुक्रवारी मध्यरात्रीच्या अतिवृष्टीमुळे शहरातील प्रमुख नाले दुथडी भरून वाहू लागले. अंबाझरी तलावाजवळून वाहणाऱ्या नाल्यात तलावाचे पाणी शिरल्याने पूर आला. हा नाला गांधीनगर, शंकरनगर, रामदासपेठ, बर्डी व पुढे जातो. या नाल्याच्या पुराचे पाणी अंबाझरी लेआऊट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगर, सेंट्रल मॉल आणि लगतच्या वस्त्यांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाल्यावर अनेक ठिकाणी पक्के बांधकाम करण्यात आले आहे. अनेक जण येथे कचरा टाकतात.

आणखी वाचा-“सत्तेसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी राज्यात पेपरफुटी”, विजय वडेट्टीवार यांचा आरोप; म्हणाले…

शंकरनगरजवळील नाल्यालगत एका शाळेची भिंत काही दिवसांपूर्वीच कोसळली होती व तिचा मलबाही नाल्यातच पडला होता. तोही काढण्यात आला नव्हता. नाल्याला पूर आला तेव्हा वेगाने येणारे पाणी पुढे जाण्याऐवजी मार्गातील अडथळ्यांना अडून आजूबाजूंच्या वस्त्यांमध्ये शिरले.

नाल्यातील पक्के बांधकाम तोडले असते व त्यातील मलबा, कचरा योग्य पद्धतीने यापूर्वीच काढला असता तर पाण्याचा प्रवाह न अडता सरळ गेला असता व वस्त्यांना फटका बसला नसता. वहन क्षमतेपेक्षा अधिक पाणी नाल्यात आल्याने समस्या उद्भवल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याच्या वेळी सांगितले होते. पुरापासून धडा घेत नव्याने उपाययोजना करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते.

Story img Loader