लोकसत्ता टीम

नागपूर : अंबाझरी तलावाजवळून पुढे शंकरनगर, रामदासपेठ, बर्डीकडे वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात पक्के बांधकाम, काँक्रिटचा मलबा आणि तत्सम प्रकारचे अडथळे आल्याने पाणी शेजारच्या वस्त्यांमध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Jewellery stolen Lalbagh procession,
मुंबई : लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान दागिने, मोबाइलची चोरी; सात लाखांचे दागिने, कॅमेरा चोरीला
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
municipal administration started temporary repairs on ghodbandar flyover and inspection of roads
ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
pune markets crowded
पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर
Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
bike rider looted at sangam bridge area
लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीस्वार तरुणाची लूट, संगम पूल परिसरातील घटना
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी
Growth in major sectors of india marathi news
देशातील प्रमुख क्षेत्रांतील वाढ जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवर मर्यादित

शुक्रवारी मध्यरात्रीच्या अतिवृष्टीमुळे शहरातील प्रमुख नाले दुथडी भरून वाहू लागले. अंबाझरी तलावाजवळून वाहणाऱ्या नाल्यात तलावाचे पाणी शिरल्याने पूर आला. हा नाला गांधीनगर, शंकरनगर, रामदासपेठ, बर्डी व पुढे जातो. या नाल्याच्या पुराचे पाणी अंबाझरी लेआऊट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगर, सेंट्रल मॉल आणि लगतच्या वस्त्यांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाल्यावर अनेक ठिकाणी पक्के बांधकाम करण्यात आले आहे. अनेक जण येथे कचरा टाकतात.

आणखी वाचा-“सत्तेसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी राज्यात पेपरफुटी”, विजय वडेट्टीवार यांचा आरोप; म्हणाले…

शंकरनगरजवळील नाल्यालगत एका शाळेची भिंत काही दिवसांपूर्वीच कोसळली होती व तिचा मलबाही नाल्यातच पडला होता. तोही काढण्यात आला नव्हता. नाल्याला पूर आला तेव्हा वेगाने येणारे पाणी पुढे जाण्याऐवजी मार्गातील अडथळ्यांना अडून आजूबाजूंच्या वस्त्यांमध्ये शिरले.

नाल्यातील पक्के बांधकाम तोडले असते व त्यातील मलबा, कचरा योग्य पद्धतीने यापूर्वीच काढला असता तर पाण्याचा प्रवाह न अडता सरळ गेला असता व वस्त्यांना फटका बसला नसता. वहन क्षमतेपेक्षा अधिक पाणी नाल्यात आल्याने समस्या उद्भवल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याच्या वेळी सांगितले होते. पुरापासून धडा घेत नव्याने उपाययोजना करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते.