लोकसत्ता टीम

नागपूर : उड्डाण पुलाची चुकीची रचना आणि उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी पर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्याने उत्तर नागपुरातील नागरिकांना रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळ, सिव्हिल लाईन्सकडे ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

new water purification project, water purification Bhandup Complex, Mumbai,
मुंबई : भांडूप संकुलातील नव्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामला सुरुवात, जुन्या प्रकल्पाचे आयुर्मान संपुष्टात
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
third bridge over Vashi Khadi, bridge Vashi Khadi open,
नवी मुंबई : वाशी खडीवरील तिसऱ्या पुलावरून आजपासू वाहतूक सुरू, टोलमुक्तीमुळे सततची वाहतूक कोंडी फुटली
metro services
‘मेट्रो ३’ विस्कळीत, दोन दिवसांतच तांत्रिक अडचणी
thane building
डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
Vasai, car dealers and garages, Roads Vasai,
वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे
Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
Anger among commuters over digging of new concrete road in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप

नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझनच्या सभासदांनी या समस्येकडे अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावर प्रशासनाने काहीही केले नाही. सदर उड्डाण पूल बांधण्यात आल्याने संविधान चौकातून उत्तर नागपुरात जाण्यासाठी सरळ मार्गाच उरलेला नाही. बिशॉप कॉटन, स्मृती सिमेना टॉकिजकडून वळण घेऊन उत्तर नागपूर गाठावे लागते. शिवाय या भागात वाहतुकीची कायम कोंडी होत असते.

आणखी वाचा-नागपूर : फडणवीस यांची ग्रामस्थांशी ‘चाय पे चर्चा‘, म्हणाले…

एखाद्या उड्डाण पुलामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याचा देशात पहिलाचा प्रयोग नागपुरात झाला आहे. झिरो माईलपासून उत्तर नागपुरात येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रिझर्व बँक ते कामठी रोड हाच एकच मार्ग आहे. मागील पन्नास वर्षांपासून सुरू होता, पण आताच दोन वर्षापासून हा मार्ग बंद आहे. सदर बाजारपेठेतून उड्डाण पूल करण्यात आले. त्यामुळे कोराडी व सावनेर मार्गाने येणाऱ्यांची सोय केली आहे. परंतु उत्तर नागपूरच्या नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे, नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरमचे नरेश साखरे म्हणाले.

उत्तर नागपूरच्या विकासाच्या बाबतीत प्रशासन आणि शासन उदासून आहे. उत्तर नागपूरचा मुख्य रस्ता बंद करून उत्तर नागपूरबद्दल उदासीन मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. -अश्विन बोरकर, नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरम.