अकोला : गत दोन दशकांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात झालेल्या पाच निवडणुकांमध्ये भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. तिरंगी लढत भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची परंपरा विरोधक यावेळेस सुद्धा खंडित करू शकले नाहीत. संजय धोत्रे यांनी निर्माण केलेला अकोला भाजपचा गड पूत्र अनुप धोत्रे यांनी कायम राखला. यावेळेस लोकसभेतील मताधिक्य कमी झाल्याने आता विधानसभा निवडणुकीत दबदबा कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे राहणार आहे. अकोला मतदारसंघात स्वबळावर काँग्रेस किंवा वंचितला गेल्या साडेतीन दशकात यश मिळवता आलेले नाही. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. त्रिकोणी लढतीचा नेहमी भाजपला फायदा झाल्याचा इतिहास आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा