अकोला : पती व पत्नीमध्ये प्रेम, विश्वास व जिव्हाळ्याचे नाते असते. हे नाते साताजन्माचे असल्याची भावना भारतीयांच्या मनात आहे. ६० वर्षांच्या संसारात अतूट प्रेम असलेल्या पती व पत्नीने अवघ्या आठ तासाच्या अंतरात जगाचा निरोप घेतल्याचा अतिशय भावनिक व दुःखद प्रसंग जिल्ह्यातील बाळापूर शहरात घडला. वयस्कर दाम्पत्यामधील प्रेमामुळे मृत्यू देखील त्यांची ताटातूट करू शकला नाही. अतूट प्रेमाच्या भावनेमुळेच त्यांनी एकत्रितपणे जगातून निरोप घेतल्याची चर्चा मृत्यूनंतर होत आहे.

जिल्ह्यातील बाळापूर शहरात गुजरातीपूरा भागामध्ये रमेशसिंग करणसिंग गौतम (८२) यांचे राहणे होते. दीर्घ आजारामुळे रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले, तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पद्माबाई (७६) यांनी देखील पहाटे अंतिम श्वास घेतला. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ तासातच पत्नीने देखील हे जग सोडले. लग्नानंतर ६० वर्ष वैवाहिक आयुष्याचा प्रवास एकत्र केल्यानंतर दोघांनी काही वेळाच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग आणि पद्माबाई या दोघांची पहिली भेट त्यांच्या पाहणीच्या कार्यक्रमात झाली होती. त्यावेळी पती २२, तर पत्नी १६ वर्षांच्या होत्या.

jitendra awhad bishnoi gang,
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आव्हाडांचे कार्यकर्ते सावध, एप्रिल महिन्यात आव्हाड यांनाही आली होती बिष्णोई टोळीची धमकी
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
59-year-old man fell in one side love with 17-year-old girl and hit bike due to rejection
५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
Vidhan Sabha Election 2024
अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळविण्यात अडचणी- ज्योतिषांची भविष्यवाणी
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

हेही वाचा : नागपुरातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात आरोपी महिलेला जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने…

पद्माबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील होते. रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले होते. लग्नानंतर दोघांचाही संसार आनंदाने फुलला. संसाररुपी वेलीवर दोन मुले आणि दोन मुली अशी फुले उमलली. मुलांचे पालपोषण त्यांचे शिक्षण यामध्ये आयुष्याची अनेक वर्ष निघून गेली. कालांतराने मुल-मुली मोठे झाल्यावर त्यांची लग्न झाली. नातवंडांच्या रूपाने जीवनात आणखी आनंद आला. आयुष्यात सुख समाधान होते. संपूर्ण आयुष्य बाळापूरसारख्या लहान शहरात गेले. ६० वर्षांचा दीर्घकाळ एकमेकांसोबत आनंदी संसारात गेला. वयोमानानुसार आरोग्याची कुरबुरी सुरू झाली. दीर्घ आजापणामुळे पतीचे निधन झाले.

हेही वाचा : अकोला : कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री

पती रमेशसिंग यांचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नी पद्माबाई यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यातून त्या सावरू शकल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर अवघ्या आठ तासातच पत्नी पद्माबाई यांनी आपला जीव सोडला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दु:खद प्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते. पती व पत्नीमध्ये खूप प्रेम होते, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. याची बरीच चर्चा आहे.