अमरावती : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून एप्रिल ते नोव्‍हेंबर २०२३ या कालावधीत पळून गेलेल्‍या, हरविलेल्‍या ८५८ मुलांची सुटका केली आहे. त्यामध्ये ५९१ मुले आणि २६७ मुलींचा समावेश आहे. या मोहिमेसाठी ‘आरपीएफ’ला ‘चाईल्डलाईन’सारख्या स्वयंसेवी संस्थेची मदत झाली आहे. मुंबई विभागातून २५२ मुले , भुसावळ विभागातून २३८, पुणे विभागातून २०६, नागपूर विभागातून १११ आणि सोलापूर विभागातून ५१ मुलांची सुटका करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बुलढाणा जिल्हा हादरला! प्रेमी युगुलापाठोपाठ प्रियकराच्या वडिलांची आत्महत्या; साखर खेर्ड्यातच घेतला गळफास

सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत हरवलेल्या आणि घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने रेल्‍वे सुरक्षा बल काम करत आहे. रेल्‍वे सुरक्षा बलाने गेल्‍या आठ महिन्यांत मध्य रेल्वेवरील स्थानक आणि फलाटांवरील मुलांची सुटका केली आहे. अनेक मुले कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता शहरांकडे धाव घेतात. मध्‍य रेल्‍वेच्‍या अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले ‘आरपीएफ’ला सापडत असतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati central railway rpf found 858 missing boys and girls during april to november 2023 mma 73 css