वर्धा: एखाद्या भयपटात असावे असे वातावरण समुद्रपुर तालुक्यातील ताडगाव पंचक्रोशीत सध्या आहे. या गावाच्या एक किलोमीटर परिघात एका शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ आपली दहशत पसरवून आहे.

मात्र, बुधवारी सायंकाळपासून या वाघाने आपला मुक्काम चिमूर परिसरात हलविण्याची ताजी घडामोड आहे. चिमूर तालुक्यात पण वर्धा सीमेलगत धामणगाव येथे तो दिसून आला. दोनदा हल्ले केल्याने गावकरी जीव मुठीत घेवून जगत असल्याचे चित्र आहे.

youth from Malegaon died due to drowned
नाशिक : चोरचावडी धबधब्याजवळ बुडून युवकाचा मृ़त्यू
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Chandrapur four farmers electrocuted to death marathi news
चंद्रपूर: विजेचा धक्का लागून चार शेतकऱ्यांच्या मृत्यूने खळबळ, काय घडले?
rain water enter in hospitals in gondia
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..
Murder, family, Raigad district,
रायगड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या… नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Heavy rain in Yavatmal many villages flooded and flood in Panganga river
यवतमाळात मुसळधार, अनेक गावांत पाणी शिरले; पैनगंगा नदीला पूर
Rain Kolhapur. Kolhapur river, Kolhapur dam,
कोल्हापुरात पावसाचा मुक्काम कायम : नदी, धरणातील पाणी पातळीत वाढ

हेही वाचा… पाच हजारांवरील देयक ऑनलाईनच अदा करण्याच्या सक्तीमुळे महावितरण आर्थिक कोंडीत!..  प्रकरण काय पहा..

वन विभाग अहोरात्र गस्त घालत आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसाने या घनदाट जंगलातील पायवाटा पण निसरड्या व चालण्यास कठीण झाल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. दोनदा गाड्या चिखलात फसल्या त्या अद्याप काढणे शक्य झालेले नाही. याच परिसरात दोन बैल, एक रानडुक्कर फस्त करणारा हा वाघ केव्हा कुठे टपकेल म्हणून शेतीवर जाणे गावकऱ्यांनी सोडून दिले. तर विद्यार्थी शाळेकडे फिरकेनासे झाले. येथील जिल्हा परिषदेची शाळा जंगलास लागून आहे.

हेही वाचा… लोकजागर : ‘दारी’ येताच कशाला?

संरक्षक भिंत नसल्याने सरपंच विनायक श्रीरामे यांनी लोकांशी बोलून शाळा चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. चाळीस कॅमेरा ट्रॅप लावून अहोरात्र गस्त सुरू आहे. पण पावसामुळे शोधकार्य बरेच अवघड झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी आज सकाळी बोलतांना सांगितले.