गोंदिया : धानाचे थकीत चुकारे तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आज अखेर मागे घेतले.

आंदोलक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आमदार विनोद अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक संदेश पाठवला. त्यात धानाचे थकीत चुकारे लवकरच दिले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. याचबरोबर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न पुरवठा मंत्री, पणन महासंघाचे प्रधान सचिव, महासंघाचे प्रशासकीय संचालक यांच्याशीही चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना तत्काळ धान विक्रीचे पैसे देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश दिले व लवकरच धानाची रक्कम देण्याचा निर्णय घेऊन शासन शेतकऱ्यांना न्याय देईल, असे आश्वासन दिले.

Sharad Pawar criticism that such rulers have not been seen in the history of the maharshtra state pune print news
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी; म्हणाले, “गृहमंत्री एवढ्या सौम्यतेने…”
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Ravindra Dhangekar Allegation, Radhakrishna Vikhe Patil,
महसूलमंत्र्यांच्या वरदहस्ताने पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये २०० कोटींचा घोटाळा – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप
Shindes supporters in Navi Mumbai signaled their support for vijay Nahata
मुख्यमंत्र्यांसमोर नाईक विरोधाचा पाढा
Supporters urge Ajit Pawar to contest from Baramati Assembly Constituency pune print news
अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याचा सर्मथकांचा आग्रह
delhi aap mla saurabh bharadwaj bjp mla vijender gupta
Video: दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा; मुख्यमंत्री भाजपा आमदारांच्या गाडीत; आपच्या मंत्र्यांचं पायांशी लोटांगण!
मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल
Eknath shinde mahayuti marathi news
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या मेळाव्याकडे मित्र पक्षांची पाठ

हेही वाचा… चिमुकल्या कर्करुग्णांनी राखीतून जोडले ऋणानुबंध, मेडिकल रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन

४ सप्टेंबर पर्यंत धानाचे चुकारे देण्याचे आश्वासन

४ सप्टेंबरपर्यंत थकीत चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे शेतकरी दीपक कानसरे यांनी सांगितले.

हेही वाचा… दुर्दैवी ! रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला; मंदिरात झेंडा लावायला गेलेल्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सोसायटी चालकांनी मोठं पाप केलं – आमदार अग्रवाल

शेतकरी उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतात. अशा कष्टकरी शेतकऱ्यांच्या उत्पादनाची नासाडी करणे हे सोसायटी चालकांचे मोठे पाप आहे. या प्रकरणातील दोषी संचालकांची लवकरात लवकर चौकशी करून त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांचे पैसे परत मिळेपर्यंत आपण त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.