गोंदिया : ज्या देशांनी निवडणूक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने ई.व्ही.एम. उपकरणे तयार केली आहेत, आता त्या देशांमध्ये मतदान प्रक्रियेसाठी या ईव्हीएम मशीनचा वापर करण्याऐवजी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्याच धर्तीवर भारतातही ईव्हीएम मशीन वापरण्याऐवजी बॅलेट पेपर वर मतदान घ्यावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. आणि ईव्हीएम मशीनवर अनेक आरोप-प्रत्यारोपही विविध पक्षाकडून केले जात आहेत. त्यामुळे भारतातही यावर बंदी घालावी आणि मतदानाची प्रक्रिया बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी पिरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हेही वाचा : नागपुरातील आरटीओ अधिकाऱ्यावर गोळी सुटली नव्हे, झाडली !

Delhi Election 2025 Arvind Kejriwal (1)
दिल्लीत दुकानदार भाजपा, तर फेरीवाले ‘आप’च्या बाजूने, कारण काय?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
One Nation One Election
One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ अहवालाच्या मसूद्यासाठी किती पैसे खर्च झाले? सरकारने सांगितलेल्या आकड्यावर विश्वास बसणार नाही
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
Ajit Pawar On MSRTC
Ajit Pawar On MSRTC : एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत फेसबुकवरील जाहिरातींवर किती रुपये खर्च केले?
margin of victory in elections depends on voter participation IISER Pune developed model
निवडणुकीतील विजयाचे अंतर मतदारांच्या सहभागावर अवलंबून; ‘आयसर पुणे’ने विकसित केले मॉडेल
Rohit Pawar
“अर्थसंकल्पासाठी महायुती सरकारकडून ८३ लाखांच्या बॅगांची खरेदी”, रोहित पवारांची नाराजी; म्हणाले, “डिजिटल युगात..”

जोगेंद्र कवाडे यांनी गोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत पिरिपा २५ जागांची मागणी महायुतीपुढे ठेवणार आहे. नुकताच लागू करण्यात आलेला हिट अँड रन कायदा वाहनचालकांवर अन्याय करणारा काळा कायदा ठरत आहे. या कायद्यात सुधारणा करून वाहनचालक व मालकाला न्याय द्यावा. आमचा पक्ष पिरिपा राज्यातील शिंदे सरकारसोबत आहे, पण आंबेडकरांची विचारधारा आम्ही बदललेली नाही बदलणार ही नाही. त्यामुळे तरुण पिरिपाच्या विचारसरणीशी जोडले गेले आहेत. आणखी या विचारधारेशी तरुणांना जोडण्यासाठी राज्यात सामाजिक यात्रेचे आयोजन करण्यात येत असून, त्याचा समारोप नागपुरातील दीक्षाभूमी येथे होणार आहे. राज्य सरकार विकास कामांमध्ये अग्रेसर भूमिका बजावत आहे. शिंदे सरकार शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात काम करत आहे.

हेही वाचा : सायबर लुटारूंनी केली तिघांची १९.५७ लाखांची फसवणूक

अट्रॉसिटीचे खटले जलदगतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक दोन जिल्ह्यांना एकत्र करून न्यायालय स्थापन करण्याची मागणीही पिरिपातर्फे शिंदे सरकारकडे करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे, असे जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेत पिरीपा जिल्हा प्रभारी महेंद्र नागदेवे, जिल्हाध्यक्ष राजू भेलावे, जिल्हा उपाध्यक्ष कोळेश्वर लेडे, जिल्हा सचिव जियालाल पटले, सुंदरलाल लिलारे, सुनील भालाधरे, श्याम सुंदर बसोद, रतनकुमार वैद्य, जय मेश्राम, दिलीप पाटील, रॉबिन भंवरजार, योगिता भंवरे आदी उपस्थित होते.

Story img Loader