नागपूर : विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने गेल्या पाच वर्षांत मुंबई आणि कोलकाता शहराचे जेवढे क्षेत्रफळ आहे, त्यापेक्षाही अधिक वनजमीन विविध विकास प्रकल्पांसाठी वळती केली आहे.

भारताचा विकास होत आहे, पण त्या विकास प्रकल्पांसाठी वनजमिनीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या पाच वर्षांत ८८ हजार ९०३ हेक्टर वनजमीन गैर वनीकरणाहेतू वळती करण्यात आली आहे. रस्ते बांधणीसाठी सर्वाधिक १९ हजार ४२४ हेक्टर, खाणकामासाठी १८ हजार ८४७ हेक्टर, सिंचन प्रकल्पांसाठी १३ हजार ३४४, पारेषण वाहिनीसाठी नऊ हजार ४६९ हेक्टर आणि संरक्षण प्रकल्पांसाठी सात हजार ६३० हेक्टर जमीन वळती करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत भाजप सदस्य सुशील कुमार मोदी यांच्या संसदेतील प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.

Several infrastructure projects are nearing completion
पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर; मेट्रो रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ
panvel agitation marathi news
एक जुलैपासून ‘नैना’विरोधी आंदोलन
adani group plans to invest s 1 3 lakh crore in fy25 across its companies
अदानी समूहाचे १.३ लाख कोटींच्या भांडवली गुंतवणुकीचे नियोजन
mumbai zopu authority marathi news
मुंबई: चटईक्षेत्रफळ उल्लंघनप्रकरणी नगरविकास विभागाच्या स्पष्टीकरणाची झोपु प्राधिकरणाला प्रतीक्षा
20 percent inclusive housing scheme MHADA will take up houses in under-construction projects
२० टक्के सर्वसमावेश गृहयोजना… आता म्हाडा निर्माणाधीन प्रकल्पातील घरे घेणार
Suicide of a young man in Dombivli suffering from mental illness after corona
प्रकल्पग्रस्तांची पुन्हा नैनाविरोधी हाक… ; एक जुलैपासून आंदोलन
Aether two wheeler manufacturing project in Bidkin Industrial Estate soon An investment of more than thousand crores is expected
‘एथर’चा लवकरच बिडकीन औद्योगिक वसाहतीत दुचाकी निर्मिती प्रकल्प; हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित
BDD Chawl Redevelopment Project, MHADA, 11 Months Rent in Advance to Residents of BDD Chawl, BDD Chawl, bdd chawl worli, mumbai news,
बीडीडी चाळ पुनर्विकास : पात्र रहिवाशांना मिळणार घरभाडे

एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत केंद्राने रेल्वे प्रकल्पांसह २५ पेक्षा अधिक प्रकल्प, कामांसाठी वनजमीन वळती करण्याचे निर्णय घेतले. यात औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसह सौरऊर्जेची कामे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा आदींचा प्रामुख्याने सहभाग आहे.