नागपूर : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसारखे नेतृत्व आमच्याकडे आहे. तिघांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक नंबरवर जात आहे. त्यामुळे काँग्रेससह विविध पक्षांचे नेते आता महायुतीमध्ये प्रवेश करणार असून त्यांचे स्वागत आहे, असे मत भाजपच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. महायुतीच्या मेळाव्यानिमित्त चित्रा वाघ नागपुरात आल्यास त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा : मिशन लक्ष्यवेध! ऑलिम्पिक वीर घडविणारा ‘हा’ उपक्रम कोणत्या खेळांसाठी वाचा…

devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
Congress to help Aam Aadmi Party against BJP in final phase
अखेरच्या टप्प्यात ‘आप’च्या मदतीला काँग्रेस?
Bhokardan , Raosaheb Danve,
‘माजी’ झाल्याने फरक पडत नाही, फक्त नाव पुरेसे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी

काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला आणि ते शिंदे गटात प्रवेश करत असतील तर महायुतीमध्ये त्यांचे स्वागत आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाऊ. पुढेही अनेक नेते महायुतीकडे येतील. म्हणून बरीच लोक आमच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नार्वेकरांनी वस्तुस्थितीप्रमाणे, हातात असलेल्या कागदपत्रांप्रमाणे निर्णय दिला आहे. आपण आधीपासून पाहतो की उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून रडीचा डाव खेळत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयसुद्धा सोडलेले नाही. त्यांच्या बाजूने निकाल लागला तर सर्व चांगले आणि विरोधात निकाल गेला तर ते त्यांच्याकडील असलेले असेच ठेवणीचे शब्द वापरत असतात, अशी टीका त्यांनी केली. २२ जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू रामचंद्र मंदिराच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी काँग्रेसने नकार दिला असेल तर त्यांना प्रभू रामचंद्र सद्बुद्धी देवो अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.

Story img Loader