नागपूर : महाविकास आघाडी कपट कारस्थान करुन आणि शकुनी नितीने जिंकलीआहे. संविधान बदलवणार असा खोटा अपप्रचार केला. आम्ही विकसित भारतासाठी मत मागितले होते मात्र या निवडणुकीत जातीवाद जिंकला आणि विकासाचा पराभव झाला असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होेते. महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा अपप्रचार केला. पराभवाची कारणे अनेक असली तरी आम्ही त्यावर आत्मचिंतन करीत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात जास्तीत जागा महायुती जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीने जातीयवादावर मत मागितले. एरवी भाजप जिंकली तर ईव्हीएममुळे जिंकली असा आरोप विरोधकांकडून केला जातो आता राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर ईव्हीएम बरोबर आहे का? काँग्रेसची दुहेरी निती आहे. जनतेशी खोटे बोलून मत घेतात. एकदा जनता भ्रमित झाली असली तरी आता दुसऱ्यांदा होणार नाही.

Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली

हेही वाचा : बळवंत वानखडे यांना अमरावतीकरांनी दिलेली साथ ठरली निर्णायक

जातीच्या राजकारणात जनतेने मतदान केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपने जातीवाद कधीही आणला नाही मात्र विरोधकांनी जातीयवादावर निवडणूक लढवली आहे. फडणवीस यांनी पराभवाची जवाबदारी स्वीकारली आहे. या राज्यात घरकुल दिले, शेतकऱ्यांना सन्मान दिला तरीही जनतेने आम्हाला काही क्षणासाठी दूर केले आहे. फडणवीस यांनी सरकारमध्ये राहून काम करावे. केंद्राला आम्ही विनंती केली आहे. फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारु नये आणि वरिष्ठ नेतृत्व स्वीकारणार नाही असा विश्वास आहे.

हेही वाचा : धानोरकर यांच्या विजयात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आ.सुभाष धोटे यांची भूमिका महत्त्वाची, तिकीट मिळविण्याच्या संघर्षात…

एक निवडणूक हरल्याने काही फरक पडत नाही, जातपात लोक सोडतील..मुस्लीम बौद्ध आणि आदिवासी समाजाला विरोधकांनी भीती दाखवण्याचे काम केले आहे. मोदी हे देशाचे नेते आहेत, मतदान टक्केवारीत आम्ही पुढे आहोत, काही जागा कमी मतांनी हरलो, मागील वेळेच्या तुलनेत आमची मते वाढली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वणवण फिरून काम केले, महायुतीच्या उमेदवारासाठी आम्ही ताकदीने लढलो. त्यामुळे महायुतीबद्दल कोणीच संभ्रम निर्माण करू नये,असेही बावनकुळे म्हणाले.

Story img Loader