नागपूर : जरांगे पाटील आंदोलन करीत असलेल्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी लाठीमार केला होता. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात काही बाबी समोर आल्या आहेत. मराठा आंदोलकांवर लाठीमार कोणी केला, हे मनोज जरांगे पाटील बघतील. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करणे ही बाब अयोग्य आहे. आपण या घटनेचे समर्थन करू शकत नाही, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी नागपूर येथे मांडली.

मराठ्यांवर लाठीमार निषेधाची बाब आहे. तो काही कौतुकास्पद विषय नाही. परंतु, तो नेमका कुणी केला, हे जरांगे पाटील शोधून काढतील किंवा सरकार त्याबद्दल खुलासा करेल. अंतरवाली सराटी येथील पोलिसांनी केलेला लाठीमार दुर्दैवी होता, असे आपले ठाम मत आहे. हे कृत्य टाळता आले असते. एवढे मोठे आंदोलन सुरू असताना सरकारला त्याबद्दल कळत नाही आणि स्थानिक पातळीवर अधिकारी निर्णय घेत असतील, तर हे सरकारचे अपयश आहे, असे ते म्हणाले.

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Chhota Rajan gang. session court. Pre-arrest bail ,
विकासकाकडून दहा कोटींची खंडणी मागण्याचे प्रकरण : छोटा राजन टोळीच्या दोघांना सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश

हेही वाचा : “गृहखाते सांभाळण्यात फडणवीस नापास”, सुषमा अंधारेंची टीका, म्हणाल्या, “मुख्यमंत्री बग्गीतून शेतात जातात…”

अंतवाली सराटी येथील अधिकारी व सरकार मराठा आंदोलन हाताळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले. लाठीमार झाल्यानंतर आंदोलन आणखी पेटले. सरकारला हेच पाहिजे होते काय, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. पोलिसांनी महिलांवर अमानुष हल्ला केला. पोलिसांनाही दुखापत झाले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. सरकार ती करणार नसेल तर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader