नागपूर : राज्याची राजधानी आणि उपराजधानी यांना जोडणारा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाला ओळखले जाते.कोट्यावधीचा निधी खर्च करून मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे तीन वर्षांआधी करण्यात आले. राज्यातील अतिशय महत्वपूर्ण महामार्ग असल्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येत प्रवाशी या महामार्गावरून प्रवास करतात, मात्र त्यांच्यासाठी अद्याप मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाही. शौचालयसारख्या अतिशय आवश्यक सुविधेकरिताही प्रवाशांना भटकंती करावी लागते. महामार्गावर संचालित पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांची स्थिती अतिशय वाईट आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट अधिकाऱ्यांना सुनावले आणि घाणेरडे शौचालय एकदा जाऊन तर बघा, असे निर्देश दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा