नागपूर : थेट परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात गेल्या अडीच वर्षांत क्रमांक एकवरच आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. कोणते उद्योग गेल्या दोन-अडीच वर्षांत आले, त्यातून किती कोटींची गुंतवणूक आली व किती रोजगार मिळणार आहे याचा लेखाजोखाच त्यांनी सादर केला.

हेही वाचा : Anil Deshmukh Attack: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ

torres fraud mumbai news in marathi
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः आतापर्यंत ११,३०० गुंतवणूकदारांची १२० कोटींची फसवणूक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mpsc group b exam paper and answer sheet leak offered for 40 lakh rupees
‘एलआयसी’ पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणारे गजाआड, मुंबई-पुणे रस्त्यावरील काॅलसेंटरवर छापा
pune police loksatta news
पिंपरी : रूग्णालयात गुंतवणुकीच्या बहाण्याने सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याची सव्वाकोटीची फसवणूक
Two burglars arrested in Madhya Pradesh news in marathi
घरफोडया करणाऱ्या दोघांना मध्‍यप्रदेशात केले जेरबंद; चार गुन्‍हयांची कबुली, साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्‍तगत
NITI Aayog diagnoses deterioration in maharashtra state financial health
राज्याचे ‘वित्तीय आरोग्य’ खालावल्याचे निती आयोगाकडून निदान
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा

राहुल गांधी यांनी केलेले आरोप फडणवीस यांच्या कार्यालयाने आकडेवारी सादर करत खोडून काढले. गुजरातला उद्योग पळाले, सात लाख कोटींची गुंतवणूक तिकडे गेली हे बेछूट आरोप हास्यास्पद आहेत. हा मविआचा नवा ‘फेक नरेटिव्ह’ असून गुजरात थेट परकीय गुंतवणुकीबाबत सहाव्या-सातव्या क्रमांकावर आहे व महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे, असे फडणवीस म्हणाले. प्रकल्पांची यादी खूप मोठी आहे. ७ हजार कोटींच्या परकीय गुंतवणुकीतील ५२ टक्के फक्त महाराष्ट्रात आली आहे. देशात सर्वांत जास्त पायाभूत सेवा प्रकल्प महाराष्ट्रातच सुरू आहेत, असे ते म्हणाले. एखादा उद्योग दुसऱ्या राज्यात गेला म्हणून विरोधक ओरड करतात. अनेक उद्योग असेही आहेत की ज्यांच्याबाबत स्पर्धा होती. तामिळनाडू, कर्नाटक, गुजरातसह अनेक राज्ये स्पर्धेत असतानाही या उद्योगांनी महाराष्ट्राला पसंती दिली. उद्योगअनुकूल वातावरण, सवलती जिथे उत्कृष्ट आहेत तिथेच उद्योग जातात आणि म्हणूनच त्यांची पसंती महाराष्ट्राला असते, असे फडणवीस म्हणाले.

Story img Loader