नागपूर : मोदी सरकारने कापड उद्योजकांना कापूस स्वस्त मिळावा म्हणून ११ टक्के आयतकर माफ केल्याने परदेशातून कापूस मोठ्या प्रमाणात भारतात आला, देशातील कापसाचे भाव पडले आणि परिणामी कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यात ४६० आत्महत्या झाल्या, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडले. यामुळे उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. दुसरीकडे विविध रोगामुळे सोयाबीनचे उत्पादन जरी घटले असले तरी बाजार योग्य भाव मिळत नाही. शासन मदत जाहीर करते पण ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. पिक विमा काढुन सुध्दा तो मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. याच कर्जबाजारीपणामुळे यवतमाळ जिल्हात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

Man Kills Grandfather Janardhan Rao
धक्कादायक! देशातील प्रसिद्ध उद्योगपतीची नातवाकडून हत्या; मालमत्तेच्या वादातून आजोबांना ७३ वेळा चाकूने भोसकले!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pune Crime News Person Dies By Suicide in in Shivajinagar District Court premises
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात तरुणाची आत्महत्या; कौटुंबिक वादातून आत्महत्या
PSI from Pune commits suicide by hanging in Lonavala
पुण्यातील पीएसआयची लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
sant Tukaram maharaj suicide news in marathi
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
producer k p chowdary dies by suicide in goa
प्रसिद्ध निर्मात्याने ४४ व्या वर्षी गोव्यात केली आत्महत्या, ६५० कोटी कमावणाऱ्या सुपरहिट सिनेमाची केलेली निर्मिती, नेमकं काय घडलं?
Congress MLA Shakeel Ahmed Khan Son Dies By Suicide
काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या, शासकीय बंगल्यात आढळला मृतदेह
pimpri chinchwad city 6 suicides in a day
Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी सहा आत्महत्या

हेही वाचा : अकोला : पारस येथील सौरऊर्जा प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध, विस्तारित औष्णिक प्रकल्पासाठी आग्रही; …तर रस्त्यावर उतरून निषेध

राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहे. एकटया यवतमाळ जिल्हयाचा विचार केला तर सन २०२२ मध्ये एकुण २७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सन २०२३ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत तब्बल १८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. इतक्या मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असतांना राज्यसह केंद्रातील भाजपा सरकार यावर काही बोलण्यास तयार नाही.

Story img Loader