नागपूर: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वारंवार स्वत:च्या पक्षाची भूमिका व झेंडे बदलू नये, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. प्रेस क्लबमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रामदास आठवलेंसारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद करेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर पत्रकारांनी राज ठाकरेंना महायुतीत घेणार का, असा प्रश्न आठवलेंना विचारला. त्यावर आठवले म्हणाले, राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा आधी निळा, भगवा, हिरव्या रंगाचा होता. त्यानंतर तो भगवा झाला. राज ठाकरे यांचे विचारही सातत्याने बदलताना दिसतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा