नागपूर : प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील ‘बर्ड फ्लू’ संक्रमणाला केंद्रीय आरोग्य पथकाने गांभीर्याने घेतले आहे. पथकाच्या सूचनेवरून संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील ८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले तर सर्वेक्षणाचा परिघही १ किलोमीटरवरून तीन किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला.

८ मार्चला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पशू आरोग्य साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रभाकर झा, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ. कमलेश किराड नागपुरात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे सहसंचालक डॉ. नवीन सारंग आणि श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. ज्योती हेही नागपुरात पोहचले. हे पथक सातत्याने प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रासह परिसराला भेटी देत प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पथकाच्या सूचनेवरून नागपूर महापालिकेने थेट संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या ८७ कर्मचाऱ्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेत पाठवले. पथकाच्या सूचनेवरून नागपूर महापालिकेने केंद्राच्या तीन किलोमीटर परिघात सर्वेक्षण सुरू केले आहे. या परिघात सुमारे दीड लाख लोकसंख्या येते. त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण करायला सुमारे चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे पथक आणखी किती दिवस नागपुरात काम करणार आणि त्यांच्या तपासणीत काय पुढे येणार? याकडे या क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.

चिरनेरमधील बर्डफ्लूची साथ आटोक्यात आल्याचा पशुधन विभागाचा दावा, चिकन आणि अंडी शिजवून खाण्याचेही नागरिकांना आवाहन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prakash Abitkar marathi news
आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान दोन वेळा अचानक भेटी द्या, आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांना सूचना
Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
Continuous increase in GBS patients in Maharashtra
‘जीबीएस’ बळीनंतर केंद्र सरकार सावध; सोलापुरात रुग्णाचा मृत्यू; सात तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती
centre sends expert team for maharashtra to control guillain barre syndrome
महाराष्ट्रात ‘जीबीएस’चा धोका वाढताच केंद्र सरकार ‘अलर्ट मोड’वर! केंद्राचे उच्चस्तरीय पथक राज्यासाठी तैनात 
Palghar bird flu updates in marathi
पालघरमध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव नाही; पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची केली अंमलबजावणी

हेही वाचा : खुशखबर… शिक्षक बदल्यांचा मार्ग मोकळा; राज्यातील शिक्षकांत आनंदाचे वातावरण

झाले काय?

सदर शासकीय ‘कुक्कुट पालन केंद्रात’ बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसात रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवले. चार मार्चला आलेल्या अहवालात या कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाने नियमानुसार संबंधित कुक्कुटपालन केंद्राचा एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानंतर पाच मार्चच्या रात्री संबंधित कुक्कुटपालन केंद्रातील ८ हजार ५०१ कोंबड्यांना मारण्यात आले. सोबतच केंद्रातील १६ हजारांहून जास्त अंडीही नष्ट केली गेली. तर या केंद्राच्या १ किलोमिटर परिघात येत असलेल्या पशुवैद्यकीय विद्यापीठाचेही कुक्कुटपालन केंद्र असून तिथल्याही २६० कोंबड्यांना मारण्यात आल्या.

हेही वाचा : नागपुरात परीक्षेच्या तोंडावर कांजण्यांनी डोकं वर काढले! बालरोग तज्ज्ञ म्हणतात…

बर्ड फ्लू म्हणजे काय ?

‘बर्ड फ्लू’ हा आजार एच ५ एन १ या विषाणूमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदक, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचे क्षेत्र वाढते तो माणसांमध्येही पसरू शकतो. परंतु मानसांना या विषाणूची लागन होण्याचे प्रमाण खूपच कमी असते.

Story img Loader