नागपूर: लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून केली आहे. सुरेश भट सभागृहात राहूल गांधी संविधान संमेलनाला मार्गदर्शन करताना राहूल गांधी म्हणाले, संविधान स्वातंत्र्याच्या लगेच काढण्यात आले असा आरोप होतो. परंतु संविधानामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, भगवान बुद्ध अशा सर्वांचे विचार आहेत. संविधानामध्ये हजारो वर्षांपासून झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज आहे. भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि महात्मा गांधींचे विचार संविधानामध्ये होते. हे एक पुस्तक नाही तर तो जगणे आणि मरण्याची शिकवण देतो. संविधानात सर्व धर्माचा आदर, समान अधिकार हेच बोलले आहेत. संघ आणि भाजपचे लोक जेव्हा संविधानावर आक्रमण करतात तेव्हा ते केवळ यावर हल्ला करत नाही तर देशातील कोट्यवधी जनतेच्या आवाजावर हल्ला करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा