नागपूर : उद्या गुरुवारपासून नागपुरात सुरू होणारे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असले तरी प्रत्यक्षात १० दिवसच कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राज्य सरकारला चिमटा काढला आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होत असताना पूर्वी तीन ते चार आठवडे अधिवेशन होत असे. मात्र, गेल्या काही वर्षात अधिवेशनाचा कालावधी कमी झाला आहे.

उद्या गुरुवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्त नागपुरात महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्षाचे सर्वच नेतेमंडळी दाखल होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वागत फलक लावण्यात आला आहे. मात्र या स्वागत फलकावर असणारा मजकूर हा राज्य सरकारला चिमटा काढणारा आहे. प्रत्यक्ष अधिवेशन हे दोन आठवडे असले तरी कामकाज मात्र दहा दिवस चालणार आहे. त्यामुळे “फक्त १० दिवस होणाऱ्या अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत,” असा मजकूर असलेले भलेमोठे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लावण्यात आले आहे.

palghar zilla parishad latest news in marathi
पालघर : मध्यरात्रीनंतर जिल्हा परिषदेचा सांस्कृतिक कार्यक्रम थांबविणाऱ्या पोलिसांसोबत पदाधिकाऱ्यांचा वादंग
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prime Minister Modi will inaugurate the All India Marathi Literature Conference to be held in Delh
व्यासपीठावर बसण्यासाठी रुसवे-फुगवे! संमेलनाच्या आयोजकांना राजशिष्टाचारामुळे त्रास
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप
Friction between Mahayuti allies intensifies with guardian ministership issue
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला का गेले? राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मनोमीलन का नाही?
Ajit Pawar on dowry
Ajit Pawar : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात – उपमुख्यमंत्री अजित पवार
response on loksatta editorial
लोकमानस : विलंब, नाराजीनाट्यांची मालिका
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे

हेही वाचा : हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस नेते नितीन राऊत उपोषणावर, कारण…

हे फलक विमानतळातून बाहेर निघणाऱ्या मार्गावर लावण्यात आले आहे. यावर शरद पवार तसेच राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे छायाचित्र आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग यांच्यासह शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि जिल्हाध्यक्ष राजू राऊत यांचे छायाचित्र आहे.

Story img Loader