नागपूर : पहिल्या टप्प्यात नागपूरसह पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडले. गडचिरोलीत ७० टक्के तर नागपूरमध्ये फक्त ५४ टक्केच मतदान झाले. याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती येथील प्रचार सभेत केला. नागपूरला कमी झालेल्या मतदानाकडे त्यांनी लक्ष वेधले.

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अमरावती मतदारसंघासह पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार असून त्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अमरावतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी सोमवारी अमरावती येथे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. पवार यांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. केंद्रात पुन्हा मोदीच्या नेतृत्वात सरकार आले तर संविधान बदलण्याचा धोका व्यक्त केला.

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Sharad Pawar on Uday Samant
Sharad Pawar: पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, “मी वाट बघतोय…”

हेही वाचा : गोविंदा आला अन्…; ‘रोड शो’ने चिखलीतील रस्ते फुलले

भाषण संपवत असताना पवार थांबले व म्हणाले “ मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान झाले. नागपूरमध्ये ५४ टक्के तर आदिवासी जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ७० टक्के मतदान झाले. शहरी भागातील सुज्ञ नागरिकांचे मतदान कमी तर दुर्गम भागातील आदिवासींचा जिल्ह्यात मतदान अधिक. यातून आपल्याला काही शिकले पाहिजे. त्यामुळे अमरावतीत ८० टक्के मतदान व्हायला हवे. राज्यात महाविकास आघाडींच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे रक्षणासाठी दिल्लीत पाठवायचे आहे.”

Story img Loader