नागपूर: संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीवर आहे. कधी नव्हे इतक्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतल्या आहेत. प्रत्येक सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांना लक्ष केले आहे. पवार यांच्यावरील खालच्या पातळीवरील टीका महाराष्ट्रातील जनतेला पसंत पडली नसल्याने त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला ( शरद पवार) होईल, असा विश्वास या पक्षाचे नेते व प्रवक्ते वेदप्रकाश आर्य यांनी व्यक्त केला आहे.

आर्य हे पक्षाच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये गेले होते. तेथील मतदान आटोपून ते नागपुरात परतले आहे. तेथील निवडणूक स्थितीबाबत त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले प्रधानमंत्री मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना खालची पातळी गाठली. यामुळे पवार यांच्या प्रतिमेवर काहीच परिणाम झाला नाही. कारण महाराष्ट्रातील जनता त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत आहे. मात्र अशाप्रकारच्या टीकेमुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी झाली आहे. याबाबत जनतेच्या मनात संताप आहे. याचे परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना भोगावे लागतील. बारामती मतदारसंघातही हेच चित्र दिसून आले.

Baba Siddiqui murder, Baba Siddiqui NC,
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने राष्ट्रवादीला धक्का
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
BJP strength in Maharashtra due to Haryana assembly election 2024 victory print politics news
हरयाणाच्या विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपला बळ
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
“ही तर जुनी बातमी, त्यात नवीन काय?” फडणवीस कोणाबाबत बोलले?
PM Narendra Modi
PM Narendra Modi : “विकासकामे थांबवणाऱ्यांना सत्तेपासून लांब ठेवा”, पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यासह जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसला होते.
भाजपच्या माजी खासदारांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, परस्पर विरोधी तक्रार

हेही वाचा : सत्कारमूर्ती म्हणून मिरवणाऱ्या शेतकऱ्यास चोरी प्रकरणी अटक, कळंब तालुक्यातील शेतमाल चोरी प्रकरण

पश्चिम महाराष्ट्रातील एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटल्या होत्या. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शरद पवार यांच्यावर मोदींनी केलेल्या टिकेचा समाचार घेतला होता. त्यापूर्वी भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनीही बारामतीमध्ये आम्हाला शरद पवार यांचा पराभव करायचा आहे, असे सांगितले होते. मतदान झाल्यावर अजित पवार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांनी असे वक्तव्य करायला नको होते, अशी प्रतिक्रिया दिली होती हे येथे उल्लेखनीय. बारामतीची निवडणूक यंदा विविध कारणांमुळे गाजली. मतदानाच्या दिवशी पैसे वाटप करण्यात आले असा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भातील व्हिडिओ एक्स वर टाकून केला होता. सोमवारी ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही काही काळ बंद होते. हा मुद्दा सध्या गाजत आहे.