नागपूर : मराठा समाजाला आराक्षण देण्याचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढे आणला होता आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आज हा समाज रस्त्यावर आला आहे. त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, असे जर सांगितले असते आणि सिद्ध केले असते तर आज एवढा विषय चिघळला नसता. फडणवीस केवळ आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

विजय वडेट्टीवार हे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील यांनी मागणी केली की आरक्षण जाहीर केले जाईल, असे नाही. उलट जरांगेना सरकारने वेळ देऊन फसवणूक का केली? असा प्रश्न उपस्थित करत सरकार समाजाला केवळ खेळवत ठेवण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली. नागपुरात विदर्भातील सर्व ओबीसी संघटनेची रविभवन येथे उद्या सोमवारी अकरा वाजता बैठक होणार आहे. यात ४० संघटना असणार आहे. १० दिवसात आरक्षण देता येते का? पुन्हा तोंडाला पान पुसली जातात. आता ही जवाबदारी सरकारची आहे. मात्र त्यांनी ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर येईल असा इशारा त्यांनी दिला.

Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
devendra fadnavis on political extortion
Devendra Fadnavis Exclusive: “काही मध्यम स्तरावरचे नेते हे धंदे करत होते, पण…”, पॉलिटिकल एक्स्टॉर्शनबाबत फडणवीसांची सडेतोड भूमिका!
Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली

हेही वाचा : “आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजात भाजप दुफळी निर्माण करतेय”, नाना पटोले यांची टीका; म्हणाले, “मराठा आरक्षणावर…”

जरांगे हे श्रद्धेय फडणवीस म्हणत असतील आणि दुसऱ्यांना एकेरी भाषेत बोलत असतील. त्यांनी कुणाकुणाचा पान उतारा केला याची यादी आहे आमच्याकडे, आता ते नैतिकतेचे धडे शिकवत आहे. वारंवार भूमिका बदलणारे अनेक नेते तयार झालेले आहे. रंग बदलू मंडळींची महाराष्ट्रात भर पडत आहे. सदावर्ते हे सरकारची भाषा बोलत आहेत, हे लपून नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Story img Loader