नागपूर: नागपूरमध्ये होणारें विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादळी ठरते. कधी राजकीय आरोप – प्रत्यारोपांमुळे तर कधी पक्षातील फूट यासाठी कारणीभूत ठरते. यंदा सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये अधिवेशनाला सुरूवात होत आहे. मागच्या अधिवेशन काळात शिवसेनेत फूट पडल्यावर विधिमंडळ परिसरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून वाद झाला होता. आता याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात संघर्ष होतो का? की यावर तोडगा काढला जातो याकडे लक्ष असणार आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

गोदावरी खोऱ्यातील नेत्यांचा नार-पारचे पाणी पळविण्याचा प्रयत्न – गिरणा धरणावरील मेळाव्यात आरोप
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Offense against municipal employee refusing to sign Panchnama
पिंपरी : पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देणार्‍या महापालिका कर्मचार्‍यावर गुन्हा
Adivasis march to Vikas Bhavan for Pesa recruitment nashik news
पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?
High Court, Maha vikas Aghadi, Maharashtra bandh, Badlapur incident, bandh, unconstitutional, 2004 judgment, latest news, loskatta news,
महाविकास आघाडीला महाराष्ट्र बंद करण्यास मज्जाव, बंद बेकायदा असताना तो पुकारलाच कसा ? उत्तर दाखल करण्याचे आदेश
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
National Child Rights Commission, Badlapur,
राष्ट्रीय बालहक्क आयोगाचा आज बदलापूर दौरा, शाळा व्यवस्थापन आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक

नागपूर विधानभवन परिसरात सर्व प्रमुख पक्षांसाठी कार्यालय दिले जातात. त्यात भाजप, कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी व अन्य मान्यताप्राप्त पक्षांचा समावेश असतो. सेनेत फूट पडल्यावर दोन्ही गटांकडून कार्यालयावर दावा केला होता. अखेर गटाला जागा देण्यात आली होती. याचीच पुनरावृत्ती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडण्याची शक्यता आहे. कारण या पक्षातही फूट पडली आहे. दोन्ही गट त्यांचाच पक्ष अधिकृत असल्याचा दावा करीत असल्याने विधिमंडळ कार्यालयाचा ताबा कोणाकडे असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. अधिवेशनापूर्वी याचा निकाल आयोगाने दिल्यास वादावर तोडगा निघू शकतो.