शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांना आजी माजी नेत्यांनी घेरले. तेव्हा काही खास वगळता कोणीही त्यांच्या बाजूने जोरकस बाजू मांडत नसल्याचे चित्र राज्याने पाहले. पक्ष विरहित समाजकारण करणारे तर दूरच.या पार्श्वभूमीवर सदैव आंदोलनाच्या भूमिकेत राहणाऱ्या युवा परिवर्तन या स्वयंसेवी संघटनेने ठाकरे समर्थनार्थ यात्राच काढली आहे.

हेही वाचा >>>वर्धा: शेतीच्या आर्थिक वर्षास ‘सांजोनी’ ने आरंभ, जाणून घ्या लुप्त होत चाललेल्या या प्रथेबाबत

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : “संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी झालाय, त्यामुळे त्यांना…”; राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला मनसेचं प्रत्युत्तर!
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन

येथील ‘युवा परिवर्तन की आवाज’ या संघटनेने शिवाजी चौकातून यात्रेचा जागर केला. २२ मार्चला रामटेक येथील राम मंदीरातून यात्रा सुरू झाली असून ३० मार्चला मुंबईत मातोश्री येथे यात्रेचा समारोप होणार आहे. रामटेक, यवतमाळ, अमरावती ते मालेगाव, नाशिक, भिवंडी असा मार्ग राहणार असून मुंबईत यात्रा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापासून ते मातोश्री निवासस्थानापर्यंत पायदळ राहणार आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी

संघटनेचे निहाल पांडे म्हणाले की यात्रेचे नाव महाभारत यात्रा आहे. महाभारतात ज्याप्रमाणे कौरवांनी धोका देत पांडवांचे राज्य हस्तगत केले होते त्याचप्रमाणे शिंदे-फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना धोका दिला. केंद्राच्या सत्तेचा धाक दाखवत ठाकरेंना वनवास दाखविला. उध्दव ठाकरे हे एकनिष्ठ लोकांच्या ताकदीवर खंबीरपणे उभे आहे. एखाद्या व्यक्तीचे घर सरकारने पाडले तर सर्वसमाज त्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहतो. सरकार विरोधात आंदोलन करतो. लाखो शिवसैनिक शिवसेनेला आपले घर मानत होते. हे घर उध्दव ठाकरे यांना परत मिळवून देण्यासाठी ही यात्रा असल्याचे निहाल पांडे म्हणाले.

यावेळी शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. यात्रेत मोठ्याप्रमाणात महिला व युवक सहभागी झाले आहे.