लोकसत्ता टीम

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार ही त्यांच्याच वर्धा जिल्ह्यात अर्धवट असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना पहिल्याच पावसात बसला.

Due to hunger strike of sugarcane growers problems of Congress leaders siddharam mhetre have increased
ऊस उत्पादकांच्या उपोषणामुळे काँग्रेस नेते म्हेत्रेंच्या अडचणीत वाढ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
Ghodbunder, Citizens Ghodbunder protest,
घोडबंदरमधील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या
satara police arrested couple for malpractice in majhi ladki bahin yojana
लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Harshvardhan Patil
जिल्ह्यात महायुतीला धक्का? माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष

हिंगण तालुक्यातील खैरी पन्नासे शिवारात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नाला खोलीकरण एकतर उशिरा सुरु करण्यात आले. त्यामुळे पावसाळा सुरू होऊनही काम पूर्ण होऊ शकले नाही .शिवाय ज्या भागात खोलीकरण झाले त्या भागातील आजूबाजूला असलेल्या शेतातील गाळ नाल्यात येणार नाही यासाठी बांध तयार करण्यात आला नाही. त्यामुळे सोमवारी पहाटे काही तास आलेल्या पहिल्याच पावसात या नाल्याच्या बाजूला असलेल्या अभिमान झाडे, रमेश पन्नासे, लल्लन पाल, जगन ठाकरे आदी पाच सहा शेतकऱ्यांच्या शेतातील उपयुक्त माती व गाळ वाहून या नाल्यात गेला. यातील काही शेतात पेरणी सुद्धा करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-महापारेषण कंपनीत लवकरच बंपर भरती

आता पूर्ण पावसाळा बाकी आहे. त्यामुळे शासनाने या कामाची पाहणी करून शेताचे नुकसान होऊ नये यासाठी नाला व्यवस्थित करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.