वर्धा : उद्योगाच्या विकासातील ‘ब्लिचिंग’चा अडथळा दूर करण्याबाबत उद्योजक आग्रही असल्याचे चित्र पुढे आले आहे. वर्धा एमआयडीसी परिसरात काही उद्योगांवर निर्बंध आहे. लगत सेवाग्राम आश्रम असल्याने प्रदूषण निर्माण करणारे उद्योग सुरू करण्यास केंद्राने पूर्वीच मनाई करून ठेवली आहे. या अडचणी दूर व्हायला हव्यात, अशी भूमिका उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे तसेच काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटून व्यक्त केली. गांधी आश्रम असल्याने काही उद्योगांना बंदी आहे. त्याचा सर्वांत मोठा फटका वस्त्रोद्योगास बसत आहे. कपडे तयार करण्याच्या उद्योगास कापड साफ करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर होतो. यामुळे प्रदूषण होत असल्याने ते वापरण्यास मनाई आहे. परिणामी तयार कपडे निर्मिती व्यवसायात अडचण आली आहे. मात्र हेच पावडर शहरात सरसकट वापरल्या जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा