वर्धा : वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा झाली. यासाठी वर्धा शहरालगत जागेचे प्रस्ताव पण पाठविण्यात आले. पण वर्धा नाही तर हिंगणघाट येथेच हे महाविद्यालय व्हावे म्हणून लढा सुरू झाला. हिंगणघाट येथे तर सर्वपक्षीय समिती स्थापन होत आंदोलन सुरूच आहे. यात आपण मागे पडायला नको म्हणून मग आमदार समीर कुणावार यांनीही उडी घेतली. चालू अधिवेशनात तर त्यांनी मागणीसाठी पायरीवरच ठिय्या दिला. हे कमी की काय त्यांनी महाविद्यालय द्या नाही तर राजीनामा घ्या, असे अस्रच बाहेर काढले. इकडे वर्ध्यात संभाजी ब्रिगेडने वर्ध्यातच व्हावे म्हणून आंदोलनास आरंभ केला आहे. यात आता भर आर्वीची पडली आहे.

हेही वाचा : नागपूर हादरले! घरमालकाचा भाडेकरू विवाहितेवर बलात्कार

BAMS student died during sleep in the hostel
चंद्रपूर : धक्कादायक! ‘बीएएमएस’च्या विद्यार्थिनीचा वसतिगृहात झोपेतच मृत्यू…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
thailand school bus fire
Thailand Bus Fire: धक्कादायक! थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागून २५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
Abuse on Girl pune, Pune college Girl Abuse,
पुणे : महाविद्यालयाच्या आवारातच युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा
swatantra veer savarkar swimming pool nashik
नाशिक : तलाव नुतनीकरणाचा संथपणा महिलांसाठी त्रासदायक, मर्यादित सत्रांमुळे नाराजीत भर
18 year old college girl student commits suicide by hanging self in his hostel room
College Girl Suicide : नाशिकमध्ये वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

एक महिन्यापूर्वीच येथे तीनशे खाटा क्षमतेचे रुग्णालय मंजूर झाले. ती सुरवात होती. हे महाविद्यालय आर्वीलगत तळेगाव येथे स्थापन व्हावे म्हणून सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. हेच गाव सोयीचे व गरजेचे. महामार्ग असल्याने मोठे अपघात होतात. पण चांगल्या उपचाराची सोय नाही. लगत मोर्शी, वरूड व अन्य मोठा ग्रामीण परिसर आहे.त्यांना उपचारासाठी अमरावती, नागपूर पेक्षा तळेगाव सोयीचे पडते, असा युक्तिवाद करण्यात आला.प्राचार्य डॉ.श्याम भुतडा म्हणाले की जिल्ह्यात हा सर्वात दुर्लक्षित भाग आहे. इथेच झाले पाहिजे. डॉ.रीपल राणे, ज्येष्ठ पत्रकार विजय अजमिरे, डॉ.अरुण पावडे तसेच रेडक्रॉस, मदत, लॉयांस, भारत सेवक समाज, रोटरी, मातृ सेवा संघ, पत्रकार संघटना आदी या भेटीत सहभागी झाले होते.