वर्धा : महाराष्ट्राचा द्वेष करणारे हे भाजप सरकार घालवून द्या, असे आवाहन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज केले. महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी, देशात एक नेता एक पक्ष, असे सरकार नकोच, अशी भूमिका मांडली.

महाराष्ट्र, विदर्भातील उद्योग गुजरातमध्ये गेले. आता यांनाही गुजरातमध्ये पाठवून देण्याची वेळ आली आहे. या लोकांनी संपूर्ण जगात हिंदुत्व बदनाम केले. केवळ विरोध करतात म्हणून तुरुंगात टाकले जाते. हे घराणेशाहीवार बोलतात, पण ज्यांचे घराणे आहे, त्यांनीच घराणेशाहीवर बोलावे, असा टोला ठाकरेंनी लगावला. मला आदित्यला मुख्यमंत्री करायचे असेल तर ते मी नाही लोकं ठरवतील, जय शहांसारखे बसवून देणार नाही. मोदी व भाजप यांची अवस्था आता, ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा,’ अशी झाली आहे. देशात संमिश्र सरकारे चांगली कामे करतात. म्हणून एका पक्षाचे सरकार यापुढे नकोच, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील टपाल तिकीट प्रदर्शनात मराठी बोलल्याने डोंबिवलीकराबरोबर अरेरावी
वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील टपाल तिकीट प्रदर्शनात मराठी बोलल्याने डोंबिवलीकराबरोबर अरेरावी
suraj chavan gets bail from mumbai High court
खिचडी घोटाळा प्रकरण : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना जामीन, वर्षभरानंतर कारागृहातून सुटका
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
Maharashtra kesari Kaka Pawar on Shivraj Rakshe About Controversy
Maharashtra Kesari: “महाराष्ट्र केसरीच्या पंचांना जन्मठेप देणार का?” शिवराज राक्षेच्या निलंबनानंतर कुस्ती प्रशिक्षकांचा संतप्त सवाल, नेमकं काय म्हणाले?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”

हेही वाचा : शरद पवार नागपूरच्या मतदानाबाबत अमरावतीच्या सभेत काय म्हणाले ?

‘विरोधातील प्रत्येकास संपवण्याचा सपाटा’

यावेळी शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. विरोधातील प्रत्येकास संपवण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. संविधान बदलण्याची भाषा बोलली जाते. पण तसे कदापि होऊ देणार नाही. वाटेल तो त्रास सहन करू पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही. यासाठी आघाडीला मतदान करा, असे आवाहन पवार यांनी केले. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनीही केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. उमेदवार अमर काळे, माजी मंत्री अनिल देशमुख, रणजीत कांबळे, रोहिणी खडसे यांचीही भाषणे झालीत.

Story img Loader