वर्धा : महाराष्ट्राचा द्वेष करणारे हे भाजप सरकार घालवून द्या, असे आवाहन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज केले. महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी, देशात एक नेता एक पक्ष, असे सरकार नकोच, अशी भूमिका मांडली.

महाराष्ट्र, विदर्भातील उद्योग गुजरातमध्ये गेले. आता यांनाही गुजरातमध्ये पाठवून देण्याची वेळ आली आहे. या लोकांनी संपूर्ण जगात हिंदुत्व बदनाम केले. केवळ विरोध करतात म्हणून तुरुंगात टाकले जाते. हे घराणेशाहीवार बोलतात, पण ज्यांचे घराणे आहे, त्यांनीच घराणेशाहीवर बोलावे, असा टोला ठाकरेंनी लगावला. मला आदित्यला मुख्यमंत्री करायचे असेल तर ते मी नाही लोकं ठरवतील, जय शहांसारखे बसवून देणार नाही. मोदी व भाजप यांची अवस्था आता, ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा,’ अशी झाली आहे. देशात संमिश्र सरकारे चांगली कामे करतात. म्हणून एका पक्षाचे सरकार यापुढे नकोच, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

Govind Bagh, Baramati, Sharad Pawar,
बारामतीत गोविंदबागेत इच्छुकांची भाऊगर्दी, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडून शरद पवार यांंची भेट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
vijay wadettiwar criticized shinde govt
“महाराष्ट्राचं भल व्हावं, असं वाटत असेल तर…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचं शिंदे सरकारवर टीकास्र!
regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
Antar Singh Aryas appeal to youth says responsibility of youth to save tribals
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
ST employees Congress, ST bus, Maharashtra ST bus,
तोट्यातल्या एसटीला शासनाकडूनच कोट्यवधींचा चुना; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
Maharashtra Crime News
Crime News : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बदलापूर, मुंबई अकोल्यासह मुलींवर अत्याचाराच्या मन सून्न करणाऱ्या घटना

हेही वाचा : शरद पवार नागपूरच्या मतदानाबाबत अमरावतीच्या सभेत काय म्हणाले ?

‘विरोधातील प्रत्येकास संपवण्याचा सपाटा’

यावेळी शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. विरोधातील प्रत्येकास संपवण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. संविधान बदलण्याची भाषा बोलली जाते. पण तसे कदापि होऊ देणार नाही. वाटेल तो त्रास सहन करू पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही. यासाठी आघाडीला मतदान करा, असे आवाहन पवार यांनी केले. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांनीही केंद्र सरकार व भाजपवर टीका केली. उमेदवार अमर काळे, माजी मंत्री अनिल देशमुख, रणजीत कांबळे, रोहिणी खडसे यांचीही भाषणे झालीत.