वाशीम : यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक विभागांत दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही दुष्काळी सवलती कधी लागू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात एकूण ४६ महसूल मंडळ असून त्यापैकी ३८ मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. परिणामी या भागातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना विशेष सवलती लागू होतात. मात्र दुष्काळी घोषणा होऊनदेखील आवश्यक त्या सवलती मिळत नसल्याने शासनाची घोषणा मृगजळ ठरली आहे.

Ankita Patil Thackeray question to Harshvardhan Patil regarding funding for development works in Indapur taluka Pune print news
हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी कन्या अंकिता मैदानात
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Bonus Mumbai municipal corporation, Mumbai municipal corporation employees, Code of Conduct,
मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपये बोनस, आचार संहिता लागू होण्यापूर्वी तातडीने घोषणा
On the occasion of Dussehra more than three and a half thousand vehicles have been registered in the transport department vasai news
दसऱ्याच्या निमित्ताने वाहन खरेदी जोरात; परिवहन विभागात साडेतीन हजाराहून अधिक वाहनांची नोंदणी ; ११ कोटी ९४ लाखांचा महसूल
tigers existence in sahyadri belt
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आठ वाघांचे अस्तित्व
dead man cremated in front of golegaon gram panchayat in sillod
सिल्लोडमधील गोळेगाव ग्रामपंचायत समोरच मृत व्यक्तीचा अंत्यविधी
A march to the collector office for various demands of tribals nashik
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका

हेही वाचा : तरुणीला टवाळखोरांकडून बेदम मारहाण, आतेभावासोबत मंडई पाहण्यासाठी गेली असता…

यावर्षी पावसाच्या हुलकावणीमुळे खरीप हंगामात शेतीपिकांना मोठा फटका बसला. यामुळे उत्पन्नात घट झाली. रब्बी हंगामदेखील संकटात आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील बहुतांश महसूल मंडळे दुष्काळाने होरपळली आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा : सरसंघचालकांचे तीर्थाटन! आज शेगावात, वाशीमच्या बालाजी, माहुरवासीनी रेणुकाईचेही घेणार दर्शन; कडक पोलीस बंदोबस्त

अनेक भागातील पेरा वाया गेला, उत्पन्न घटले असून यासाठी आर्थिक मदत किती मिळणार याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे टॅंकरने पाणीपुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावातील वीज कनेक्शन खंडित न करणे, या सवलती द्याव्यात, अशी मागणी जि.प.सदस्या सरस्वती मोहन चौधरी यांनी केली आहे.